दान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला दिलेले अन्न, कपडे, पैसे किंवा इतर वस्तू केवळ त्याच्या मदतीस येत नाहीत, तर दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातही शुभता आणि समाधान घेऊन येतात. मात्र प्रत्येक गोष्ट दानासाठी योग्यच असते, असं नाही. काही विशिष्ट वस्तू अशा असतात, ज्या दान केल्याने उलट नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे नियम केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर त्यामागे एक प्रकारचा आध्यात्मिक आणि सामाजिक विचारही दडलेला असतो.
झाडू-

उदाहरणार्थ, झाडू ही केवळ घर साफ करण्याची वस्तू नसून, अनेक धार्मिक मान्यतानुसार तिच्यात माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील समृद्धीशी संबंधित झाडू दान करणे अशुभ मानले जाते. झाडू दान केल्यास लक्ष्मी घरातून निघून जाते, अशी श्रद्धा आहे.
फाटलेली धार्मिक पुस्तके
त्याचप्रमाणे फाटलेली धार्मिक पुस्तके किंवा शास्त्रेही दान करणे टाळले पाहिजे. ज्ञानाचे प्रतीक असलेल्या या वस्तू जर फाटलेल्या अवस्थेत दुसऱ्याला दिल्या, तर त्यातून अज्ञान, अपयश आणि अडथळ्यांचा प्रसार होतो, असा विश्वास आहे. त्यामुळे अशा गोष्टींना आदराने वागवून योग्य प्रकारे विसर्जित करणे अधिक उचित ठरते.
तेल
तेल दान करणेही एक संवेदनशील बाब आहे. विशेषतः वापरलेले किंवा जळलेले तेल कोणा गरजूला देणे अपशकुन मानले जाते. त्यामुळे ते गरिबी, आजारपण किंवा दुःखाचे कारण बनते, अशी धारणा आहे.
स्टीलची भांडी
स्टीलची भांडी, जी घरात दररोज वापरली जातात आणि घरगुती सौख्याशी जोडली गेली आहेत, ती दान करण्यास मनाई आहे. काही धर्मशास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की ही भांडी दान केल्यास कुटुंबातील सौख्य आणि स्थैर्य ढासळू शकते.
शिळे अन्न
शेवटी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिळे अन्न. अनेकदा आपण गरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने शिळे अन्न देतो, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, हे अन्न शुद्ध मानले जात नाही. अशा प्रकारचे अन्न दान केल्याने घरात दुःख, आजारपण किंवा मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.