सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने जिल्हा व तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने त्वरित पंचनामे करवे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच येथे नूतन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, जिल्हाधिकारी … Read more

‘असं वाटतयं संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्यात प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी निगडीत आहे. संरक्षण विभागाचे खुप कामे आहेत. एक संपले की दुसरे येते. उड्डाणपूलाचा प्रश्न सुटला की के के रेंज येतो. के के रेंज झाले की नगर-जामखेड रस्ता, मग पुढे बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन. त्यामुळे असे वाटते संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही,’ असे वक्तव्य … Read more

माझा शेवट भाजपातच इोईल  

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे  भाजपाला काही प्रमाणात फटका बसणार आहे. परंतुपक्ष अत्यंत मजबुत आहे. मी मात्र त्यांच्या कोणत्याही प्रकारे संपर्कात नाही. माझे राजकारण भाजपातच चालणार असून माझा शेवटही भाजपातच होईल असे स्पष्टीकरण माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिले. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमा दरम्यान  ज्येष्ठ नेते खडसे यांनी … Read more

या गावचा सात महिन्यांनंतर भरला आठवडे बाजार

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला आठवडे बाजार तब्बल सात महिन्यानंतर शनिवारी भरविण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये संपूर्ण आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जेऊर येथे शनिवारी भरण्यात येणारा आठवडे बाजारही बंद करण्यात आला होता. जेऊरला दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरत असतो. … Read more

खासदार विखे म्हणतात बांधावर फोटोशेषन करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीच्या काळात राज्य सरकारची कार्यपद्धती पूर्णपणे फोल ठरले असून प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर चाललेले फोटोशेषन करण्याऐवजी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. आज दौरे करण्यापेक्षा दौऱ्यावरील खर्च वाचून शेतर्क­याला मदत केल्यास त्यांना हजार दोन हजारांची मदत जास्त मिळुन फायदा होईल. पण वेगवेगळ्या मंत्र्यांचे दौरे काढून नुकसानीची पाहणी करण्यात व्यस्त … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित ठेवू नका उर्जामंत्री तनपुरे यांच्या प्रशासनाला सुचना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले असून, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी. शेतकरी मदतीपासून वंचित राहणार याची प्रत्येक प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्याने खबरदारी घ्यावी. यासाठी सरसकट पंचनामे करून सरकारची मदत प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम व्यवस्थीतपणे करा. अशा स्पष्ट सूचना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला दिल्या. राहुरीचा माणूस आमदार … Read more

बारामती पॅटर्न म्हणजे भुलभुलैय्या नवे पर्व आणि आता विसरा सर्व : राम शिंदे यांची आ.रोहीत पवारांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एक वर्षे पूर्ण होऊनही मतदारसंघात एकही विकासकाम अथवा उद्योगधंदे आणले नाहीत, मात्र पवार यांनी स्वत:चेच उद्योगधंदे वाढवले व जनतेला वेड्यात काढले. निवडणुकी दरम्यान घोषणा केलेला बारामती पॅटर्न म्हणजे निव्वळ भुलभुलैया आहे. नवे पर्व आणि आता विसरा सर्व अशी घणाघाती टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर … Read more

सरकारने मंदिरे उघडावी अन्यथा कुलूप तोडू

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मंदिरे हि हिंदूंची शक्ती केंद्रे आहेत.भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिर उघडावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करोडो हिंदू समाजाच्यावतीने करत आहे,यासाठी विश्व हिंदू परिषद हा समस्त हिंदू समाजाचा आवाज आहे. गेली आठ महिने बंद असलेली देवालय भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिरे सरकारने उघडावी अन्यथा कुलूप तोडू असा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसह … Read more

नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत तातडीने देण्याकरता त्वरित पंचनामे करा – महसूल मंत्री नामदार थोरात

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत हि मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने तातडीने पंचनामे करा अशी सूचना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच या ठिकाणी नवीन अधिकार्‍यांसमवेत झालेल्या जिल्हास्तरीय … Read more

थोरात सह. साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून कायम उच्चांकी भाव देत सभासद, कामगार व शेतकर्‍यांचे हित जपणार्‍या व सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. सन 2020 – 21 या गळीत हंगामातील पहिल्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतकर्यांंचा विश्वासघात झाला असून, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आ.विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या गावांचा पाहाणी दौरा केल्यानंतर विश्रामगृहात माध्यमांशी … Read more

अन्यथा नगर-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती मार्गे भिंगार येथील रहदारीच्या रस्त्यात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी दरेवाडी ग्रामपंचायतीवर थाळीनाद करीत मोर्चा नेला. या मोर्चात हरिभाऊ राहिंज, नीरज प्रजापति, बाळासाहेब बेरड, मारुती राहिंज, राजेंद्र राहिंज, बाबासाहेब राहिंज, नितीन राहिंज, आतीश राहिंज, सतीश राहिंज, संजय … Read more

‘ह्या’ तीन ठिकाणावरून जबरदस्त रिटर्न्स ; 5 लाखांवर मिळाला 2.50 लाखांचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- रेटिंग एजन्सी क्रिसिल वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांसाठी रँक देते, जे सरासरी परताव्यासारख्या अनेक घटकांवर आधारित असतात. क्रिसिल अशा अनेक निकषांवर आधारित रेटिंग देते. क्रमांक 1 च्या रँकिंगचा अर्थ असा आहे की ही योजना चांगली कामगिरी करीत आहे आणि गुंतवणूकीसाठी आकर्षक आहे. येथे आम्ही अशा 3 कर बचत ईएलएसएस योजनांबद्दल … Read more

कोरोनाचा संकट टळून, विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होण्याची जगदंबे चरणी प्रार्थना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या सातव्या माळी निमित्त बोल्हेगाव येथील आंबेडकर चौक, रेणुकानगरला भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब साठे, अलका वाघमारे, सुभाष वाघमारे, अजय वाघमारे, विशाल साठे, विकास वाघमारे, प्रकाश वाघमारे, माजी नगरसेवक किसन भिंगारदिवे आदी उपस्थित होते. बाळासाहेब वाघमारे म्हणाले की, आंबेडकर चौक रेणुकानगर येथे सालाबाद प्रमाणे नवरात्री … Read more

भाऊ कोरेगावकर यांच्या मध्यस्थीने आखेर त्या वादावर पडदा युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने व्यक्त केली दिलगिरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  युवा सेनेचे पदाधिकारी रविंद्र वाकळे यांनी शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे लेखी पत्र देऊन, वंजारी समाजामध्ये जातीवाचक शब्द वापरल्याचा गैरसमज दूर करुन या वादावर आखेर पडदा टाकला. हॉटेल यश ग्रॅण्ड येथे शुक्रवारी (दि.23 ऑक्टोबर) दुपारी शिवसेना, वंजारी समाज, जय भगवान महासंघ … Read more

बिग ब्रेकिंग : फडणवीस यांना कोरोनाची लागण, म्हणाले विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी…

state employee news

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी … Read more

कांद्याने वाढवलं सरकारच टेन्शन ; किंमती कमी करण्यासाठी उचलली ‘ही’ पावले

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कांद्याच्या किंमती पुन्हा चढू लागला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींबरोबरच सरकारचा ताणही वाढू लागला आहे. म्हणूनच सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात नियम शिथिल केले आहेत. ही सवलत सरकारने 15 डिसेंबरपर्यंत दिली आहे. या निर्णयामागील बिहार निवडणूक देखील एक कारण असल्याचे मानले जाते. आयातीची … Read more