कन्या विद्यालयात रंगला नवसिताऱ्यांचा सन्मान सोहळा

श्रीगोंदा:अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात आयोजीत केलेल्या सोहळ्यात एम पी एस सी परिक्षेत यश व राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत झेंडा रोवणाऱ्या नव सिताऱ्यांचा सन्मान केला. आणि मुलींना गणवेश व सायकल भेट दिली भाग्यश्री फंड हर्षद जगताप धनश्री फंड पल्लवी हिरवे कोमल हिरडे पल्लवी पोटफोडे सोनल नवले शितल कांगुणे निकीता काटे … Read more

माजी आ. नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेवर घेण्याचे मागणी !

शेवगाव :- राष्ट्रवादीची स्थापना करताना सर्वात प्रथम स्व.मारुतराव घुले पाटलांनी समर्थन दर्शवत शरद पवाराना पाठिंबा दर्शविला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहात घुले यांनी पवारांची साथ सोडली नाही. जिल्ह्याची वाताहत होत असताना घुले बंधुंनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आघाडीसाठी महत्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात १२ /० चे गणित बदलवत ३/९ करुन पक्ष संघटनेचा पाया मजबुत केला. याच दरम्यान … Read more

शिर्डीत रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह !

शिर्डी :- शहरातील साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ५५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेबाबत काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी … Read more

महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही … Read more

वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन, फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड … Read more

लष्करात खोटी कागदपत्रे देवून सैन्यदलाची फसवणूक

अहमदनगर : लष्करात भरतीच्यावेळी खोटी कागदपत्रे सादर करुन सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी कोमलप्रसाद पन्नालाल शर्मा रा.बिसारा जि.सीतापूर,उत्तरप्रदेश याच्या विरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,एमआयआरसी सेंटर येथे दि.१ जुलै ते दि. २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कोमलप्रसाद शर्मा याने लष्करात भरतीच्यावेळी रहिवासाची खोटी कागदपत्रे सादर करुन … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. पुलाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार … Read more

मोटारसायकलच्या अपघातात तरूणीचा मृत्यू

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे – नगर महामार्गावरील हॉटेल कुणालसमोर झालेल्या मोटारसायकल अपघातात पायल प्रशांत माळवे (वय -२३ रा. हुडको कॉलनी शिरुर जि.पुणे) यांचा मृत्यू झाला.  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३ रोजी दत्तात्रय मधुकर काजळे (रा .अकोले जि.अहमदनगर) यांच्या मोटारसायकलवर पायल प्रशांत माळवे ही डबलशीट शिरूरकडे जात असताना सुप्या जवळ अचानक कुत्रे … Read more

निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

राहुरी :- मतदारसंघातील जनतेने दोन वेळा निवडून दिले. त्यामुळे मतदारांवर आपण कधीच रोष व्यक्त करणार नाही. सरकार कुणाचेही असो, सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू. जनतेशी जोडलेली आपुलकीची नाळ कदापि तोडणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते.  कर्डिले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

महापालिका भरणार प्रदूषण मंडळाकडे एक कोटी रुपये

अहमदनगर : हरित लवादाच्या आदेशानुसार बुरुडगाव येथे बायोमिथेनायझेशन प्लांट अॉक्टोबरपर्यंत उभारण्यात महापालिकेला अपयश आले.  याप्रकरणी हरित लवादाने एक कोटींची परफॉरमन्स गॅरंटीची रक्कम प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे भरण्याचे आदेश महिनाभरापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. पुढील महिन्यात लवादाची सुनावणी असून तत्पूर्वी १ कोटींची रक्कम भरणा करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा एक कोटीचा दणका बसला … Read more

आमदार रोहित पवारांची मंत्रिमंडळात वर्णी लावा

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सर्वात मागास व दुष्काळी मतदारसंघ आहे. या वेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व रोहित पवार यांच्या रूपाने लाभले आहे.  मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात वर्णी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली. फक्त सत्ता असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन विकासात्मक … Read more

आ. रोहित पवार यांच्याऐवजी आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद ?

अहमदनगर :- राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याला किती मंत्रिपदांचा लाभ होणार, याची उत्सुकता जिल्हाभरात आहे.  मंत्रिपदांच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे नवे आमदार रोहित पवार  तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांची नावे आघाडीवर आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शिवसेनेत फुट !

अहमदनगर :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अहमदनगर मध्ये मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याचे समोर आले आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या वेग वेगळ्या गटांनी दोन स्वतंत्र जल्लोष साजरे केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेंडगे यांच्यासह काही … Read more

तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू

श्रीरामपूर ;- बाजार समिती परिसरातील जगदंबा सर्व्हिस या दुकानाच्या गाळ्यासमोर तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. १७ ऑक्टोबर रोजी अश्विनी नुरजहाँ शेख (वय ४५, रा. श्रीरामपूर) तृतीयपंथीयाला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण केली होती. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या … Read more

भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला. महाराष्ट्र राज्य कोणा समोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले. भाजपने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी … Read more