चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला अटक !

अहमदनगर :- रात्रीच्या वेळी वांबोरी घाटात अडूवन मारहाण करत लूटमार करणारे प्रमुख आरोपी अद्याप फरारच आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींकडून चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला मात्र अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी नगरहून वांबोरीला चाललेल्या एका व्यावसायिकाला या आरोपींनी बेदम मारहाण केली होती. लूटमार करणाऱ्या प्रमुख आरोपींची नावे पोलिसांना समजली असली तरी आरोपी अद्याप … Read more

जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

श्रीरामपूर | गोंडेगाव येथील नवनाथ बन्सी म्हसे यांचा जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बन्सी म्हसे हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना दरवाजा उघडून लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलगा नवनाथलाही जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भावबंधाशी शेतीच्या वाद असून तो सध्या न्यायालयात आहे. याप्रकरणी … Read more

नापिकी मुळे वृद्ध शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या

शिर्डी :- लोणीपासून चार किलोमीटर अंतरावर गोगलगाव (ता. राहाता) येथील ७४ वर्षांच्या शेतकऱ्याने नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. बाबा महादू मगर असे त्याचे नाव आहे. संगमनेर रस्त्यावर गायकर लवणात त्यांची दोन एकर जमीन आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हायटेक (सोना) ५१०१ कंपनीचे हायब्रिड मका बी पेरले होते. हे … Read more

अकोल्याची जागा भाजपला मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले :- अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली, तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा … Read more

फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग आल्याने आईचा मुलावर चाकूहल्ला !

नेवासे :- नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे ‘फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग येऊन आईने मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. जखमी विशाल दीपक साळुंखे (१८) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी शाेभाला अटकही केली. सोमवारी … Read more

आ. भाऊसाहेब कांबळे कुटुंबात काम करणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी एका आरोपीस अटक

श्रीरामपूर :- शहरातील आ. भाऊसाहेव कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेला कामगार सुरेश बळवंत वाघमारे, वय ३८ याचा दगडाने ठेचून खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवून खुनातील एक आरोपी हेमंत उर्फ दत्ता किशोर शेळके, वय ३२, रा. संगमनेर रोड, शंकरभुवन, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर याला पोलिसांनी अटक … Read more

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह अंडा गँगच्या प्रमुखावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील वाळूतस्कर अवैध व्यावसायिकांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक समद वाहब खान (वय ४७ वर्षे रा.मुकुंदनगर) व शेहबाज उर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान (वय ३२ वर्षे रा.सदर) यांना ताब्यात घेवून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. याबाबत सविस्तर असे … Read more

नगर जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई समस्या कायम

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी लावली.परंतु  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील 13 लाख 57 हजार 295 जनता पाणी टँकरवर अवलंबून आहे.  जिल्ह्यातील 487 गावे अणि 2 हजार 847 वाड्या वस्त्यांवर अजूनही 687 पिण्याच्या टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यातील 5 नगरपंचायातींच्या हद्दीत अद्याप पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. … Read more

मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी पक्षात किती आमदार राहतील याची दक्षता घ्या !

शिर्डी :- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवाशाला चांगले दिवस आणले !

नेवासे :- ‘जय हरी’ असलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बऱ्याच वर्षांनी नेवाशाला चांगले दिवस आणले आहेत. आता आमचे ठरले आहे. भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे जाहीर आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना दिले. नागरी सत्काराला उत्तर देताना विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता बर्डे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा … Read more

आमदार पुत्राकडे काम करणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

श्रीरामपुर :- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसरात सोमवारी सकाळी डोक्यात दगड टाकून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेल्या सुरेश वाघमारे या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकारामुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती … Read more

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार !

अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार … Read more

टँकरची धडक बसून श्रीरामपुरात एक ठार

श्रीरामपूर | शहरातील शिवाजी चौकातील वळणावर टँकरची (एमएच १७ एजी ९९८३) धडक बसून मोटारसायकलस्वार सुनील एकनाथ आदमाने (वय ५०) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. आदमाने (झिरंगेवस्ती, वॉर्ड नंबर १) हे नेवासे रोडकडे जात असताना त्यांना टँकरची जोराची धडक बसली. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

विधानसभेला जिल्ह्यात १२-० असाच निकाल लागेल : राधाकृष्ण विखे

नेवासे :- पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा प्रस्ताव केवळ श्रेय मिळू नये म्हणून मागील सरकारने बासनात गुंडाळला. पण फडणवीस यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला. निळवंड्याचा प्रश्न त्यांनी एक तासात मंजूर केला. विदर्भातून आलेल्या नेत्याला जे समजले, ते सत्ता गेली तरी आमच्या जुन्या नेत्यांना समजले नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री … Read more

पारनेर सैनिक बँकेत लाखोंचा अपहार

श्रीगोंदे :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे संस्थापक असलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप बँकेचे संचालक सुदाम गणपत कोथिंबिरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. कोथिंबिरे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून बँकेच्या शिलकी रकमेतून ५,४५,७७२ रुपयांचा अपहार केला. … Read more

१५ वर्षापूर्वी बायको सोडून गेली, एकटाच रहाणार्या त्याने लघुशंकेच्या शुल्लक कारणावरुन केली तिघांची गळे कापून हत्या…

शिर्डी – निमगाव शिवारातील वस्तीवर शनिवारी (दि. १३) सकाळी शेजारी राहणाऱ्या एकाने शेजारच्या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना घडली असून कोयत्याने सपासप चार करुन एकाच आरोपीने हे खून केले. घराजवळ लघुशंका करणे, कचरा टाकणे आदी कारणातून शेजारी राहणा-यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. … Read more

धक्कादायक : एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने गळे कापून हत्या !

शिर्डी :- निमगाव शिवारातील वस्तीवर शनिवारी (दि.13) सकाळी एकाने एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकुर कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शेजारीच … Read more