अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे,
शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अड. अभय आगरकर, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते उपस्थित होते.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित
- आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?
- NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!
- भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा