‘त्या’ने अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन आत्महत्या केले प्रवृत्त

शेवगाव : अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अरुण शहादेव ढाकणे (हसनापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीची आई राधाबाई तुकाराम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मी घरकाम करत असताना मुलगी तेजस्विनी फोनवर बोलताना दिसली. त्यावेळी तू कोणाशी बोलत आहे, मोबाइल कुणाचा आहे … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला. मनपातील बूटफेक प्रकरणावरून सेना व राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. शुक्रवारी सेनेने पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर टीका केली. सायंकाळी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. … Read more

राजकीय वादातून दोन गटांत मारामारी,पोलिसांवरही दगडफेक

नेवासे :- तालुक्यात राजकीय वादातून ३० एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास नेवासे शहरात दोन गटांत मारामारी झाली. दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले. तीन गाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांचे सात जण अटकेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, न्यायालयीन प्रक्रियेत स्टे मिळाल्यामुळे नगरसेवकांच्या एका गटाने वाजवलेल्या फटाक्यांमुळे दोन गटांत … Read more

नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित : खासदार गांधी

अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून युवकाचा खून

संगमनेर :- तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निघृणपणे खून केला. आरोपींनी मृतदेह फरफटत ओढत नेवून दगड खाणीत फेकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दि. १ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खून झालेल्या युवकाची ओळख … Read more

जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

अहमदनगर :- अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्याचा प्रकार व्हीडिओवर मी पाहिला. अधिकारी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे. यांच्याबरोबर जे लोक राहिले त्यांच्यावर केसेस दाखल होऊन उद्वस्थ झाले आहेत, अशी टीका आ. संग्राम जगताप यांनी गुरूवारी अनिल राठोड यांच्यावर केली. जगताप म्हणाले, अधिकाऱ्याला बूट फेकून मारलेला सर्वांनी पाहिला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी … Read more

शिर्डी विमानतळावर विमान घसरले

शिर्डी :- दिल्ली ते शिर्डी हे स्पाइस जेट बोइंग विमान शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर लँड झाल्यानंतर टर्मिनल पार्किंगकडे वळवत असताना धावपट्टी सोडून सुमारे पस्तीस ते साठ फूट विमान माती व खडी असलेल्या जमिनीत जाऊन रुतले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विमानातील १८९ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सुमारे साडेतीन तासांनंतर विमानातील प्रवाशांना … Read more

नगर जिल्ह्यात उष्णतेची लाट,दैनंदिन जीवन विस्कळीत

अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर … Read more

छिंदम बंधुंसह १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा … Read more

पिण्यास पाणी न दिल्याने मुलीचा विनयभंग

राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते. यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने … Read more

लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारा !

अहमदनगर :- अधिकाऱ्यांना बूट फेकून मारण्यात काहीच शूरपणा नाही. त्याऐवजी आपणच पिढ्यानपिढ्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारण्याचे धाडस नागरिकांनी करावे,’ असा सल्ला जागरूक नागरिक मंचाने दिला. महापालिकेत बोल्हेगाव रस्ता कामावरून झालेल्या आंदोलनात महापालिका अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा निषेध जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी … Read more

सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरुन मृत्यु

राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व … Read more

….ती राजकीय आत्महत्याच

शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृ‌ष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले. ‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते. … Read more

शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस अटक

अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली. त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी … Read more

आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नाही…

श्रीरामपूर :- राहुल गांधी नगर जिल्ह्यात येत आहेत, पण त्यांचे स्वागत करण्यासाठी ना जिल्हाध्यक्ष ना विरोधी पक्षनेता अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांना यापेक्षा काय मोठी भेट असेल, असा उपरोधिक टोला लगावत आता काँग्रेसची जिल्ह्यात कुठेच शाखा शिल्लक नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री … Read more

श्रीगोंद्यात तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करत विनयभंग

श्रीगोंदे :- तालुक्यातील टाकळी लोणार गावातील १५-१६ गावगुंडांनी मद्याच्या नशेत शिवीगाळ व अरेआवी करत तमाशातील पुरुष व महिला कलावंतांशी असभ्य वर्तन व झटापट केली. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सुमारे १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिलला टाकळी लोणार येथील म्हसोबा यात्रेनिमित्त … Read more

विखे घराण्याची दादागिरी व हुकूमशाही कायमची संपवा

संगमनेर :- काँग्रेसमध्ये सत्तेची अनेक महत्त्वाची पदे ज्यांनी सांभाळली, ज्यांनी अनेकदा स्वकियांनाच त्रास देत सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबवली, त्यांची दादागिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले, आता तुम्ही निर्णय द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सांगितले. जोर्वे या आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे … Read more

मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये – डॉ.सुजय विखे

संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे. ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली. या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी … Read more