अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे.
सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत.
त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अनेकांना नकोसे झाले आहे.एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तर मे मध्ये उन्हाच्या तीव्रता किती असेल, याची भीती नगरकरांनी घेतली आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानातही सायंकाळी लहानग्यासंह ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे चित्र सर्व उद्यानांत दिसून येत आहे.
रविवारी शहरात तापमानाने उच्चांक गाठला. रविवारी नगरचे तापमान ४५. अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी तापमान ४४.९ अंश नोंदवले गेले. नगरमध्ये यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
- विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय !
- RVNL Bharti 2024 : रेल विकास निगम पुणे येथे ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित, वाचा सविस्तर…
- Mumbai Bharti 2024 : एसएनडीटी विद्यापीठात निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत…
- Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मिळणार 50,000 रुपये…
- Ahmednagar News : वादळवाऱ्याचा अहमदनगरमधील ‘या’ भागात कहर ! केळीबाग जमीनदोस्त