अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींना मिळणार साड्या ! पण करावं लागेल ‘हे’ महत्वाचं काम…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : गुढीपाडव्याला ८७ हजार ९५० लाडक्या बहिणींना साड्या मिळणार आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे. त्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. ही शेवटची मुदतवाढ आहे. आता पर्यंत ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी केली … Read more

श्रीरामपूरकरांसाठी ‘गुड न्यूज’ ! नागरिकांची ‘हि’ समस्या येणार संपुष्टात ; सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे नियोजन,अशी असेल प्रस्तावित योजना

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास … Read more

दमबाजी करत बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन मागितली एक कोटींची खंडणी ; ‘खोक्या’च्या साडूने…

११ मार्च २०२५ पाथर्डी : बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात आजिनाथ सावळेराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

स्वतःच्या घरामागेच सापडला तरुणाचा मृतदेह ; हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

११ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला आहे. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असून प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे.सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत सोमनाथ याच्या डोक्याला मार असून पाय मोडून … Read more

सामूहिक शुभमंगल योजना ; आता लग्नासाठी जोडप्यांना मिळणार अनुदान,रक्कम असेल…

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे. सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक … Read more

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ घटनेच्या फिर्यादीचा अपघाती मृत्यू ; संशयास्पद प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात … Read more

कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ! कर्जाची परतफेड करावीच लागणार…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याच्या अर्थसंकल्पात काही ना काही कर्जमाफीची घोषणा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. मात्र, अर्थसंकल्पात कर्जमाफी बाबत कोणतीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, कर्जाची परतफेड करावीच लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा … Read more

शिर्डी विमानतळासाठी मिळणार ‘एवढा’ निधी ; सुरु होणार ‘या’ नव्या सुविधा

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी एक हजार ३६७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शिवाय लवकरच नाईट लँडिंग व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने शिर्डी व … Read more

चासमध्ये बनवली जाणार अहिल्यादेवी होळकर सृष्टी ! “स्त्री सक्षमीकरण केंद्रासह” अनेक उपक्रम…

चास (ता. नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ 588 कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून, अद्याप त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. 66 एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या सृष्टीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची योजना आहे. या सृष्टीमध्ये स्त्रियांना सशक्त करण्यासाठी विशेष … Read more

शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा धक्का ! काय आहे संपूर्ण प्रकरण?

नगर शहरात सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ८ मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ, नगर क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपीचे नाव फुरकान अन्वर कुरेशी (वय २५, रा. नागरदेवळे फाटा, ता. नगर) असे असून, पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार … Read more

अहिल्यानगर शहरात खळबळ ! प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरू

नगर शहरातील चितळे रोड परिसरातील दीपक ऑईल डेपोचे मालक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, रा. बोल्हेगाव गावठाण) हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा काहीही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी… दीपक परदेशी हे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता … Read more

शिर्डी तीर्थक्षेत्राला विशेष निधी मिळण्यासाठी जगताप दाम्पत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

११ मार्च २०२५ शिर्डी : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा … Read more

थरारक! बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले, मानेचा व पोटाचा भाग फाडला – राहुरी तालुक्यात भीतीचे वातावरण!

राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात सोमवारी पहाटे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत बिबट्याने शेतकऱ्याचे शीर धडापासून वेगळे करीत मानेचा व पोटाचा मोठा भाग फाडून खाल्ला. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे (वय ५५) असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव … Read more

शिर्डीत पनीर भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

११ मार्च २०२५ साकुरी : शिर्डी व परिसरात लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जेवणावळींसाठी पनीरला मोठी मागणी आहे. हॉटेल, ढाबे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते; मात्र वाढत्या मागणीमुळे हलक्या दर्जाचे आणि बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या हलक्या … Read more

अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. … Read more

शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील लागणार मार्गी : आ.हेमंत ओगले

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील … Read more

कुत्तरवाडी तलावातून पाणी उपसा असाच चालू राहिल्यास पाणी टंचाईचा धोका ! पिण्याचे पाणी मिळणेही होऊ शकते कठीण…

११ मार्च २०२५ तिसगाव : कुत्तरवाडी (ता. पाथर्डी) तलावातून राजरोस कृषि पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.परिणामी, तलावातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे.पाण्याचा उपसा तातडीने थांबवावा,अन्यथा तलावावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. फेब्रुवारी पासूनच तालुक्यातील पाणी साठवण्याचे विविध स्रोत संपण्याच्या मार्गावर आहेत.काही गावांमध्ये पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडून पाण्याची मागणी आता वाढू … Read more

शिर्डीतील गर्दी घटली ! साईभक्त का होत आहेत दूर? भाविकांमध्ये चिंता वाढली

देशभरातील प्रमुख २१ तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी वाढत आहे, मात्र शिर्डीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिर्डीतील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर … Read more