Ahmednagar News : साडेबारा एकर जमीन प्रकरण : अनेकांनी कोट्यवधींचे बंगले सोडले, काही पाडले, ‘या’ लोकांना दिलासा.. ताबा देण्याची प्रक्रिया सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील साडेबारा एकर जमीनचा ताबा मूळ मालकाला देण्यासाठी सध्या कार्यवाही सुरु आहे. हे प्रकरण सध्या राज्या चर्चीले जात आहे. यामध्ये अनेक लोक विस्थापित होणार आहेत. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार माणिकनगर, भोसले आखाडा या शहराच्या मध्यवस्तीतील साडेबारा एकर भूखंड मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. या साडेबारा एकर मध्ये … Read more

निळवंडे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी कमी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील डोंगराळ तसेच खडकाळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा तसेच शेरणखेल येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली, तसेच निळवंडे लाभक्षेत्रातील वाढवलेली पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच कमी करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले, की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पाण्याची कमतरता, … Read more

Ahmednagar News : २२ जानेवारी रोजी मद्य व मांसाची दुकाने राहणार बंद !

Ahmednagar News

Ahmednagar News : आयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पाडणार आहे. या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर प्रभू श्रीरामांचा जयघोष केला जाणार आहे. त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील मिरी व करंजी या मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये या दिवशी सर्व दारू व मटन विक्रीचे दुकाने पूर्णपणे … Read more

विषारी गवत खाण्यात आल्याने तीन गायी दगावल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा येथे विषबाधा झाल्याने तीन गायी दगावल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की चांदा येथील ज्ञानदेव हरिभाऊ जावळे हे चांदा ते रस्तापूर रोडलगत गट नंबर २७४/७५ येथे वस्तीवर राहतात. त्यांच्या तीन गायींना विषबाधा होऊन त्या दगावल्या. यात जावळे परिवाराचे मोठे नुकसान झाले. शेतीसाठी जोड धंदा म्हणून शेतकरी … Read more

Rahuri News : तुमचं योगदान नसताना तुम्हाला बटन दाबायची हाऊस त्यामुळे बिनबूडाचे आरोप करू नका !

Rahuri News

Rahuri News : मुळा धरणातून वांबोरी चारीला सातत्याने प्रामाणिकपणे पाणी सोडण्याचे काम खासदार सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. त्यांनी कधीही पावसाने तलाव भरलेल्या पाण्याचे जलपूजन केले नाही. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील महावितरण व मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना करून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे … Read more

खा.सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं ! प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून..

Ahmednagar News

Ahmednagar News : आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी या सुवर्ण दिवशी होणार असून, हा कार्यक्रम सर्व भारतीयांचा आहे. प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून संपूर्ण भारत देशाचे आहेत, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. येथील श्री जगदंबा देवी भक्तनिवास येथे विविध विकास कामांचा … Read more

माजी आ. कर्डिले यांच्या प्रयत्नातून ६ कोटींचा निधी मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत पाच कोटी तर अल्पसंख्यांक विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांनी दिली. नगर तालुका दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात … Read more

नगर तालुक्यातील विविध रस्त्यांचा प्रश्न मार्गी ! ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असून, यातुन प्रलंबित असलेल्या रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे. परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर – आगडगाव-कोल्हार कोल्हूबाई घाट रस्ता कामाची तसेच वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी-जेऊर पिंपळगाव उज्जैनी रस्त्याची कामाची … Read more

Shrigonda Politics : नागवडेंचं फायनल ! 2024 मध्ये अनुराधा नागवडे विधानसभा लढविणार !

Shrigonda Politics

Shrigonda Politics : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटविला असून, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. स्व. बापूंनी जीव ओतून सहकारात काम केले आहे. तालुक्याच्या विकासात त्यांचं मोठ काम असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले. तसेच राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्यासारखे जीव ओतून काम करावे, पुढील काळात मी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बीएसएनएलच्या सिम कार्डाची होणार होळी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून त्यामुळे ग्राहकांनी आपल्या सिम कार्डाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. जग आधुनिकतेकडे झुकत असताना भंडारदऱ्याचा आदिवासी भाग मात्र नेटवर्किंग समस्येमुळे दोन पावले मागेच राहीला. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तसेच अभयारण्यामध्ये इतर कंपन्यांबरोबरच बीएसएनएल ही शासकीय कंपनीही सेवा देत आहे. त्यातच भंडारदरा धरणाच्या पाणलोटात … Read more

मोठी बातमी : आ. रोहित पवार यांना ईडीचे समन्स आले, ‘या’ दिवशी होणार चौकशी

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्वाची व महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व अहमदनगर जिह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहेत. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना चौकशीचं समन्स बजावलेले असून … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेत तोडफोड करणारा पोटे निघाला खंडणीबहाद्दर ?दोन खंडणीचे गुन्हे दाखल

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तोडफोड करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. जन आधार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे याने हा प्रकार केला. पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात काल (शुक्रवार) खंडणीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी दोन शासकीय कंत्राटदारांनी स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. पहिली फिर्याद कंत्राटदार मोहसीन … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावातील महिला सरपंचासोबत गैरवर्तन,पतीसह दोन दिरांना दगडाने मारहाण

महिला सरपंचासोबत गैरवर्तन करण्याचा व तिच्या पतीसह दोघांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. गुरूवारी (दि. १८) सकाळी पावणे बाराच्या सुमारास नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. शाळेच्या आवारात थांबण्यास विरोध केल्याच्या रागातून तरुणाने हे कृत्य केले. या मारहाणीत महिलेचे पती, दीर व चुलत दीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे दीर व चुलत दीर यांना … Read more

Ahmednagar Breaking : हुंड्याने घेतला वडील आणि भावाचा बळी…! अहमदनगर जिल्ह्यातील त्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर…

सासऱ्याने मागितलेल्या हुंड्याच्या रकमेवरून कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून मुलानेच त्याच्या वडिलांचा आणि भावाचा चाकुने भोकासून खून केला. तर दुसऱ्या भावावर आणि आईवर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील सूरेगाव येथे घडली. घड्याळ्या हिरामन चव्हाण, महावीर घड्याळ्या चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर आक्रोश घड्याळ्या चव्हाण आणि रिवोन घड्याळया … Read more

आगामी काळात युवकांच्या रोजगारीचा प्रश्न मार्गी लागेल : खा. विखे

Ahmednagar News : शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली असून, शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नगर मधील एमआयडीसीमध्ये औद्योगिकीकरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे नवीन जागेमध्ये मोठमोठे उद्योग येणार असून, युवकांच्या रोजगारीचा प्रश्न देखील मार्गी लागेल, शहरामध्ये पक्ष राजकारण बाजूला ठेवून विकास कामांसाठी सर्वजण एकत्र आलो असल्यामुळे शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. साखर वाटप कार्यक्रमांमध्ये सर्वच पक्षांनी … Read more

‘या’ क्रेडिट कार्ड धारकांना आता ताज हॉटेलमध्ये मोफत राहता येणार ! तुमच्याकडे आहे का हे Credit Card

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरतर, देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय इतरही नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन आहेत जें की ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत आहेत. क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देखील देत आहेत. या ऑफरचा उपयोग … Read more

मोदी आणि शहा यांच्यामुळे संधी मिळाली आणि उपमुख्यमंत्री झालो ! मी सत्तेला हापापलेलो नाही – अजित पवार

Ahmednagar News : मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नसून मला उपमुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्यामुळे संधी मिळाली असून या संधीचे सोने करणार आहे. नगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा असून या जिल्ह्याने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते दिले आहेत. यात स्व.शिवाजीराव नागवडे यांचे देखील नाव अग्रक्रमाने येत असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

मोठी बातमी ! ‘या’ व्यवसायासाठी मिळणार 20 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंतचे कर्ज, कुठं करणार अर्ज ? वाचा सविस्तर

Business Loan : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेरोजगारीमुळे नवयुवक तरुण त्रस्त झाले आहेत. बेरोजगारी ही संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपली अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी … Read more