सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे, महाराष्ट्र … Read more

आगीत घरांचे नुकसान झालेल्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे वाटप

नाशिक, दि. 2 मे (जिमाका) : नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत येथील 116 घरांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येऊन प्राथमिक स्वरूपात तीन नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत … Read more

विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावे व उपचार, उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीत लवकरात लवकर लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती पालकमंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने पाठवलेले मान्यतेचे पत्र … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

मुंबई, दि. २ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबूक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३४१ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे … Read more

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होणार कामाच्या ठिकाणीच

अलिबाग : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात पनवेल व नवी मुंबई येथून मुंबईत अत्यावश्यक सेवा कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स,  नर्सेस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करण्यात येणार आहे. राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाला याबाबत विनंती केली होती. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूबाधित व्यक्तींची माहिती घेतली असता … Read more

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावामधील घरांच्या तसेच शेडवरील पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  त्याचबरोबर पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण प्रांताधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. वादळी पावसामुळे गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी तारळे परिसरातील नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना … Read more

श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर धडकला कोरोना व्हायरस …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांपैकी ७ पोलिस जवान कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड शहरासोबतच पाच किमी अंतरावरील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु व गार या दोन गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीस वर्षांच्या मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथील पूजा बाळासाहेब भारती या २० वर्ष वयाच्या तरुणीच्या पोटात काहीतरी विषारी ओषध गेल्याने तिला उपचारासाठी राहाता तालुक्‍यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता पूजा भारती हो उपचारापूर्वीच मयत झाली होती. दरम्यान पूजा भारती हिचा मृत्यू नेमका कोणत्या विषारी औषधाने झाला ? … Read more

कालव्यात सोने गेले वाहून;तीन दिवसांनी पुन्हा आले ताब्यात

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-कुकडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचे सोने पडले. प्रवाहाने ते वाहून गेले परंतु तीन दिवसांनी त्याच परिसरात ती सोन्याची पिशवी सापडल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर … Read more

महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे. सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता … Read more

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची अशी होतेय लूट

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यास सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणावरून मदतही मिळत आहे. परंतु या दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या मजुरांना गावी जाण्यासाठी लागणारा अर्ज काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. मोफत मिळणारा अर्ज कामगारांना 10 … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : घरासमोर कचरा जाळल्याने थेट खुनी हल्ला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  घरासमोर कचरा जाळला म्हणून टोळक्याने पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भिंगारमधील सैनिकनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गणेश सुनील कांबळे, महेश सुनील कांबळे, अक्षय सुनील कांबळे, सुनिल नामदेव कांबळे राहणार डेरी फार्म सैनिक नगर भिंगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत आशिष … Read more

अहमदनगर जिल्हयातुन बाहेर जावू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-   राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले … Read more

कोरोना मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १ : कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळून जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त … Read more

प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अन्य राज्यात अडकून … Read more

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

मुंबई, दि.1 : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात  सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनासुद्धा मूळ गावी … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 1 : कोविड-19 विरूद्धच्या लढाईत सांगलीकरांनी अत्यंत उत्कृष्ट साथ दिली. याबद्दल सांगलीकरांना धन्यवाद देत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा … Read more