मला संधी द्या मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील

राहुरी ;- वांबोरी चारीचे पाणीचे पाणी टेलपर्यंत पोहोचविण्याचे काम १० वर्षांत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जमले नाही. ते काम खासदारांनी करून दाखवले. आता मला संधी द्या, वांबोरी चारीच्या प्रश्नावर मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील मिरी, रुपेवाडी, केशव शिंगवे, चिंचोडी, शंकरवाडीसह … Read more

दहा वर्षात आ. कर्डिलेंनी कोणती पाणी योजना राबविली ?

राहुरी शहर : माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक पाणी योजना शासनाकडून मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या. आज जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना राहुरी तालुक्यात अपवादात्मक ठिकाणी टँकर सुरू होते. आमदार कर्डिले १० वर्षांपासून तालुक्याचे आमदार होते. या काळात त्यांनी एक तरी पाणी योजना राबविली का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर-राहुरी … Read more

तरुणीचा लॉजमध्ये गळा आवळून खून

सांगली : घरी मैत्रिणींसमवेत जेवण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा लॉजमध्ये रुमालाने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवार दि. १० रोजी दुपारी उघडकीस आली. वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय १९, रा. कोल्हापूर रोड, सांगली) असे तिचे नाव आहे. शहरातील एसटी स्टँड समोरील टुरीस्ट लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावर रुम नं. १०८ मध्ये ही घटना घडली. अविनाश लक्ष्मण … Read more

पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला

वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली. राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था जेलरसारखी

सोलापूर : राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे तो पिछे आओ!’ असे म्हणण्याची पाळी या नेतृत्वावर आली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीने गेल्या पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे विरोधकांना आमच्या विरुद्ध लढण्याची ताकदच राहिली नाही. राज्यात व देशात पुढील २५ वर्षे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

मुंबई: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना विविध सणांना ३१ ऑक्टोबर २०१५ च्या परिपत्रकानुसार अग्रीम देण्यात येतो. या वर्षीही या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. दिवाळी अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारने टाळूवरचे लोणी खाल्ले : थोरात

औसा : मराठवाडा आणि राज्यात शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या विमा कंपन्यांना १,१०० कोटींचा नफा झालाच कसा, असा सवाल करीत यात सरकारने टाळूवरचे लोणी खाल्ले, असा आरोप करून या सरकारला राज्यातील शेतकरी व जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बसवराज … Read more

जावई विरोधात असताना सुजयला 70 हजारांचं लीड मिळवून दिलं!

अहमदनगर :  लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेकजण माझ्यावर आरोप करत होते,  तरीही अहमदनगरमधून जावई संग्राम जगताप विरोधी पक्षातील उमेदवार असतानाही माझ्या मतदारसंघातून 70 हजारांचा लीड देण्याचं काम मी केलं होतं, असा दावा कर्डिले यांनी केला आहे.  काही जणांची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी आहे. विरोधकांचा असा समाचार आ. कर्डिले यांनी घेतला.  माझ्यावर आरोप करणारे रात्री दोन … Read more

मुख्यमंत्र्याच्या आदेशाने विखे पाटील संकटात

कोपरगाव – अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे यांना तुमच्या भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचक इशारा दिला आहे.  भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन  दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात … Read more

वंचित बहुजन आघाडीचा हटके जाहीरनामा आणि वचननामा

नगर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी हटके जाहीरनामा आणि वचननामा प्रकाशित केला आहे. शहरातील सर्वसामान्य मतदारांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले असून यातील हटके असणाऱ्या वचननाम्यामुळे शहरात चौका-चौकात कुजबुज सुरु झाली असून नगरकर मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.जाहीरनामा : नगर शहराला “औद्योगिक शहर-उद्योग नगरी” म्हणून निर्माण करणार हा विषय घेत काळे … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट संगमनेर विधानसभा मतदारसंघ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर हा मतदारसंघ. या मतदारसंघातून थोरात 1985 पासून निवडून जात आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवाराला रसद पुरविण्याचं काम बाळासाहेब विखे यांच्यापासून आता डाॅ. सुजय विखे यांच्यापर्यंतच्या तीनही पिढयांनी केलं. बाळासाहेबांच्या विरोधात वेगवेगळे उमेदवार दिले; परंतु संगमनेरमध्ये थोरात यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि त्यांनी उभं केलेलं संस्थात्मक … Read more

कर्जत -जामखेड मतदारसंघात बारामतीचं अतिक्रमण होवू देऊ नका

जामखेड : ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण या भागातील महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच मतदारसंघात मोठ मोठे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध होईल.हे सर्व पूर्णत्वास येण्यासाठी याभागात बारामतीचे अतिक्रमण होवू देऊ नका. असे … Read more

सत्ता नसल्याने पवारांच्या डोळ्यात पाणी : ठाकरे

अहमदनगर : सत्तेच्या काळात पवारांना जनतेच्या डोळ्यातील अश्रु दिसत नव्हते परंतू आता पाच वर्षे विरोधात राहिल्यानंतर त्यांना अश्रु फुटत आहे. पण हा नादानपणा आहे. अशी परखड टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. धरण कोरडे पडल्याची व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला ते काय म्हणाले हे जनता विसरली नाही. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नगर … Read more

…तरच राहुरीत धक्कादायक निकाल

राहुरी विधानसभा मतदार संघात आ .शिवाजी कर्डिले यांनी मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत माजी खा. बापूसाहेब तनपुरे, नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपुरे यांना पराभूत केले आहे. आता नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंना पराभूत करून ते राहुरीत आहे. मतदार संघाबरोबरच तनपुरे घराण्यावर विजयाची हॅट्रिक करण्याच्या कर्डिले तयारीत आहे .दरम्यान, तनपुरे , विखे यांनीही आ .कर्डिलेंची हॅट्रिक रोखण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली … Read more

थोरात साहेब, आता घरी बसा; अन्यथा जनता तुम्हाला घरी बसवेल !

संगमनेर – जो बेरोजगार आहे, त्याला आम्ही संधी देणार आहोत. शेतकऱ्यांना एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणीची सुविधा देणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार, भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची आमची मागणी असल्याची ग्वाही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. संगमनेरमध्ये ते बोलत होते. उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, ही परिवर्तनाची लाट आहे. लोकांनी मनोमन विचार केला आहे. तेव्हा … Read more

…अन मा.आमदार मुरकुटे म्हणाले… सुजयचं आमचं ठरलं!

श्रीरामपूर – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सभेला माजी आमदार भानुदास मुरकटे यांनी हजेरी लावली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे व मुरकुटे यांनी रंगत आणली. बारा विरुद्ध शुन्याची विखे यांच्या घोषणेची ठाकरे यांनी स्वागत करत कोल्हापूरकरांप्रमाणे नगरकरांनी ठरवलंय. त्यामुळे त्यांना भगवा न्याय देईल, असे सांगितले. शिवसेनेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल ठाकरे यांच्या सभेने करण्यात … Read more

आ. कांबळेंच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर दुष्काळी अनुदानापासून वंचित – करण ससाणे

श्रीरामपूर – आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निष्क्रियतेमुळेच श्रीरामपूर तालुका दुष्काळ निधीपासून वंचित राहिला, अशी टीका उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या आमदाराला जनता कदापी माफ करणार नाही, असेही ससाणे म्हणाले. काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकांमध्ये ससाणे बोलत होते . मतदारसंघातील बोधेगाव, कान्हेगाव, लाडगाव, दिघी, नायगाव, रामपूर, गोधर्वन आणि … Read more

श्रीरामपुरात लवकरच राजकीय भूकंपाचे धक्के

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे राजकीय वातावरण तापत चालले असून येत्या दोन – तीन दिवसानंतर श्रीरामपुरात राजकीय भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. ससाणे गटाने ना. विखे यांची साथ सोडून थोरातांचा हात हातात घेवून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. मात्र ससाणे गटात मोठ्या प्रमाणावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे बहतेक मोठे कार्यकर्ते आहेत. … Read more