वाहनचालकांच्या 1537 पाल्यांना तीन हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

अहमदनगर : अहमदनगर व बीड जिल्ह्यातील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी तर्फे गेल्या पाच वर्षापासून चालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे यंदा इयत्ता आठवी ते बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. अशा सुमारे 1537 पाल्यांचा शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला एकूण 47 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलेशहरातील ओम गार्डन येथे … Read more

पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं !

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – … Read more

पिचडांना शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक, सेनेसह भाजप नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

अकोले :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे … Read more

अजित पवार म्हणतात सीताराम गायकरांचं धोतर फेडू !

अकोले ;- दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला … Read more

‘त्या’ गुंडांना जशास तसे उत्तर देणार : माजी महापौर अभिषेक कळमकर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्ता मेळावा आटोपून जात असताना काही गुंडांनी मला धक्काबुक्की करत अंगावर चपला फेकण्याचा प्रकार केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास त्या गुंडांची गुंडगिरी खपवून घेणार नसून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रभर … Read more

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले…

नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा … Read more

कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलो !

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या … Read more

मनसे आघाडीत येणार?

पुणे : आघाडीत पुण्यातील आठपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर तीन जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात येणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. मित्रपक्षासाठी सोडलेली जागा कोथरूडची असून तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व आहे. यामुळे ही जागा मनसेसाठी सोडली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा जोर … Read more

आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर ! भरचौकात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर…

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे … Read more

झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

उद्या आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार ?

२१ ऑक्टोबरला होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्याविषयी आता नव्याने वावड्या उठायला लागल्या आहेत. अर्थात या वावड्या आहेत म्हणून की काय, या दोघांकडूनही यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र येत्या दि. २४ रोजी आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असून माजी आ. … Read more

उपमुख्यमंत्रिपद सेनेला – देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष विजयाचे दावे करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या … Read more

दीपक पुनिया उपांत्य फेरीत: ऑलिम्पिकसाठी पात्र

नूर सुलतान : उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस आर्तुरो मेंडेझचा अटीतटीच्या लढतीत ७-६ असा निसटता विजय मिळवून ज्युनियर विश्वविजेता दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह दीपक पुनियाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थानही निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया हा चौथा भारतीय कुस्तीपटू आहे. … Read more

कोयना धरणाचे दरवाजे बंद

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी … Read more

मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद : मध्यान्ह भोजनावेळी हृदयविकाराच्या झटक्याने येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सहशिक्षक देविदास नामदेव पवार (४८) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२०) घडली. मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी येथील मूळचे असलेले पवार कुटुंब सध्या नाशिक येथे … Read more

दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ

नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे स्वागत करताना या दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ असल्याचा दावा केला. ‘या निवडणुकीत काँग्रेस शेतकरी समस्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी आदी लोकांचे प्रश्न घेऊन मतदारांना सामोरे जाईल,’ असे काँग्रेसने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. … Read more

भाजप कडून विद्यमान २५ आमदारांचा पत्ता कट होणार ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व … Read more

उदयनराजे भोसले यांना भाजप कडून मोठा झटका

सातारा: सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रितच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत केली होती. मात्र, शनिवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही निवडणूक एकत्रित होणार नसल्याचे सांगत भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा झटका दिला आहे. दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभा … Read more