राजकीय उदासिनतेमुळे कोट्यवधी रुपये खर्च होवूनही रस्त्याची चाळण

साकुरी : अहमदनगर-मनमाड हा महामार्ग २ खासदार आणि ४ आमदारांच्या मतदारसंघातून जातो. तीन टोलनाक्यांवर रोज लाखो रुपये गोळा केले जात असताना कोपरगाव ते बाभळेश्वरपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकडो खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. साईभक्त व प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तिच परिस्थिती निमगाव ते निर्मळ पिंपरी बायपासची झालेली आहे. सरकार एकीकडे खड्डेमुक्त महाराष्ट्राचा … Read more

भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करतोय – पंतप्रधान मोदी

मथुरा : दहशतवाद एक वैश्विक समस्या बनली असून तिने जणूकाही विचारसरणीचे रूप धारण केले आहे. अशातच आमचा शेजारी देश (पाकिस्तान) दहशतवादाला पोसत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली आहे. भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करीत असून, भविष्यातही करणार असल्याचे त्यांनी ठणकाविले आहे. उत्तरप्रदेशातील पशुधन रोग निर्मूलन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, … Read more

हर्षवर्धन पाटील यांना पंचावन्न वेळा फोन केले मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत, त्यांना भाजपात जायचेच होते – अजित पवार

पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षात जायचेच होते. त्यांनी इंदापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन आमच्यावर टीका केल्यानंतर मी त्यांना सुमारे पन्नास ते पंचावन्न वेळा फोन केले. मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत. त्यांच्या पुण्याच्या घरी भेटायलाही गेलो. मात्र, ते भेटले नाहीत. त्यांनी भाजपात जायचे ठरवलेच होते, तर बिल आमच्या नावावर फाडत आहेत? असा पलटवार माजी … Read more

गळीत हंगाम होणार उशिराने सुरू

पुणे : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे उस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, पावसामुळे आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक उसपीकाला बसला असून राज्यात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील उस पीक वाया गेले आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पावसाने दडी मारल्याने उसाची लागवड म्हणावी अशी झाली नाही. अद्यापही मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, … Read more

हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता !

औरंगाबाद : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता. हा प्रकार म्हणजे ‘दिराशी भांडण अन् नवऱ्याला घटस्फोट’, असा असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. भाजपा प्रवेशानंतर पाटील यांनी केलेली राष्ट्रवादीवरील टीका अनाकलनीय असल्याचेही त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या … Read more

मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून दांम्पत्याने केले हे कृत्य

आग्रा: नवीन मोटार वाहन नियमाच्या दंडाच्या रक्कमेची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आग्रा शहरातील एका दांम्पत्याने अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून त्याला चक्क खोलीत कोंडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घरी येऊन मुलाची सुटका केली आहे. आग्य्रातील एतमादुद्दौलाच्या शाहदरा परिसरातील धरम सिंह यांनी १२ ऑगस्टला एक नवीन गाडी खरेदी केली … Read more

संगमनेरची निवडणूक लक्षवेधी ठरणार आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर – येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या … Read more

तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या पतीला दोन्ही बायकांनी शिकविली अद्दल !

कोईम्बतूर : तिसऱ्या लग्नासाठी मुलीचा शोध घेणाऱ्या पत्नीला दोन्ही पत्नींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये घडली आहे. दरम्यान, तो व्यक्ती लग्नानंतर पत्नीला हुड्यांची मागणी करून त्रास देत होता आणि न दिल्यास त्यांना मारहाण करत असे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सूलूरमधील नेहरू नगरमध्ये राहणारा एस. अरंगन उर्फ दिनेश राहतो … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर महिलेकडून शाईफेक !

अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला. शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. अकोले येथे सुगाव शिवारात … Read more

यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झालेत !

सोनई :- पुत्र प्रेमापोटी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झाले आहेत.त्यांची ही धृतराष्ट्रनीती झुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. सोनई येथील आदर्श विद्यालयाच्या मैदानावर मुरकुटे यांच्या विकास दिंडीची सांगता झाली.त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शैनेश्‍वर देवस्थानाचे विश्‍वस्त बापूसाहेब शेटे अध्यक्षस्थानी होते. … Read more

विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार : आ. राहुल जगताप

ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले, आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. … Read more

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यात … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चितळे रोडवर गळ्यात भगवा पंचा घालून मानाच्या विशाल गणपतीसमोर ढोलवर रिदम धरण्याबरोबरच ते भगवा ध्वज घेऊन देखील नाचले. आमदार जगताप यांचा हा भगवा रिदम नगर शहरातील आगामी विधानसभा निवडणुकीची वेगळी नांदी ठरू शकते. असे राजकीय धुरींचे बोलबाल आहे. आमदार जगताप यांच्या गळ्यातील भगवा पंचा आणि … Read more

मुलीची छेड काढणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले. तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे. त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर … Read more

सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्यभरासाठी दिली हि सजा…

नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुटुंबात स्विकार करावा यासाठी धर्मांतर करणाऱ्या तरुणाविषयी शंका घेत पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही परंतू तरुणाने मनापासून तरुणीचा स्विकार केला असेल तर तरुणीच्या कुटुंबियांनीही त्याला स्विकारायला हवे असा सल्ला देत धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्याभरासाठी सुयोग्य पती बन … Read more

डोकेदुखी थांबण्यासाठी तिने खाल्ल्या 15 गोळ्या पण झाले असे काही कि गमविला जीव…

बंगलूरु : डोकेदुखी असह्य झाल्याने ती शमवण्यासाठी १५ गोळ्या खाल्ल्याने गृहीणीचा मृत्यू झाल्याची घटना बंगलूरुत घडली आहे. या गोळ्यांमुळे तीने दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मुनाप्पा हा पत्नी सुमन्न्मा आणि मुलीसोबत अनेकल पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहातो. सुमन्न्माला डोकेदुखीचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरु होेते. डोकेदुखी असल्यास वेदनाशमक गोळ्या तिला डॉक्टरने दिल्या होत्या. चार दिवसांपूर्वी … Read more

लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस…

वृत्तसंस्था ;- चांद्रयान-२ मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्याच्या घटनांची इस्त्रो अगदी बारकाईने माहिती घेत आहे. इस्त्रोने विक्रमशी संपर्क तुटला त्याच रात्री चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत इस्त्रोच्या नियंत्रणाखाली लॅण्डर होते. शनिवारी पहाटे १.४० ला लॅण्डरने ठरवून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने वेग कमी करत प्रवास सुरू ठेवला. चांद्रभूमीवर उतरण्यासाठी लॅण्डरने योग्य ती दिशाही पकडली. दक्षिण गोलार्धाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू … Read more

स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदनगर :- स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन 11 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसरात श्रमदान केले तेथील विद्यार्थ्यांच्या समवेत आनंदाचा क्षण साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.  … Read more