वृत्तसंस्था ;- चांद्रयान-२ मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्याच्या घटनांची इस्त्रो अगदी बारकाईने माहिती घेत आहे. इस्त्रोने विक्रमशी संपर्क तुटला त्याच रात्री चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत इस्त्रोच्या नियंत्रणाखाली लॅण्डर होते.
शनिवारी पहाटे १.४० ला लॅण्डरने ठरवून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने वेग कमी करत प्रवास सुरू ठेवला. चांद्रभूमीवर उतरण्यासाठी लॅण्डरने योग्य ती दिशाही पकडली. दक्षिण गोलार्धाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असताना १.५० ला इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात शांतता पसरली. त्याचवेळेस काही तरी गोंधळ झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर तब्बल २० मिनिटे इस्त्रोकडून काहीच माहिती दिली जात नव्हती. २.१८ मिनिटांनी इस्त्रो प्रमुख सिवान यांनी विक्रमचा प्रवास २.१ किलोमीटरपर्यंत योग्य दिशेने सुरू होता. त्यानंतर लॅण्डरकडून पृथ्वीशी होत असलेला संपर्क तुटला.
आतापर्यंतच्या माहितीचे विश्लेषण केले जात आहे. यानुसार, पाच किलोमीटर ते तीन किलोमीटरच्या दरम्यान लॅण्डरच्या मार्गात बदल झाला. २.१ किलोमीटरपर्यंत लॅण्डर इस्त्रोच्या नियंत्रणाखाली होते. त्यानंतर ४०० मीटरवर असताना लॅण्डर आणि पृथ्वी यांच्यातला संपर्क तुटला.
लॅण्डर रडारावरून बेपत्ता झाले. प्रस्तावित जागेपासून अध्र्या किलोमीटर अलीकडे लॅण्डर उतरले. चांद्रभूमीपासून जवळच्या अंतरावरून ते कोसळल्याने त्याची हानी झाली नाही. दरम्यान, इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस असून लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे.
- Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे शिक्षक पदाच्या जागेसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 12 मे ला लॉन्च होणार मारुती सुझुकीची ‘ही’ भन्नाट कार, फिचर्स आणि किंमत पहा….
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काही तासांच्या अंतराने दोन अपघात ! दोघांचा मृत्यू
- Bank Holidays 2024 : ‘या’ महिन्यात 14 दिवस बंद राहतील बँका, कधी आहेत सुट्ट्या जाणून घ्या…
- मोदींची अहमदनगरमधील सभा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अभिवादन..असे म्हणत सुरवात, विखेंना केलेले मतदान मोदींना मजबूत करेल असे म्हणत शेवट,आरक्षणावरही भाष्य, पहा