आ.मुरकुटे यांच्यावर विखे, कर्डिले, घुलेंचे कार्यकर्ते संतापले!

नेवासे :- तत्कालीन लोकप्रतिनिधी गप्प राहिल्याने २००५ चा समन्यायी पाणीवाटप कायदा झाला. तालुक्याचे पाणी जायकवाडीला गेले हे त्याच लोकप्रतिनिधींचे पाप आहे, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.  वडाळा बहिरोबा येथे रविवारी रात्री विकासदिंडीत आयोजित सभेत मुरकुटे यांनी जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींवर पाटपाणी प्रश्नी जोरदार हल्ला चढवला. तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जाेरावर संधी देण्याचे आवाहन करतानाच पाटपाणी … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

प्रेयसीला डिझेल टाकून पेटवले, प्रियकराला अटक

नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला … Read more

काँग्रेस १११ तर राष्ट्रवादी १०४ जागा लढण्याची शक्यता

नवी दिल्ली : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यात आघाडीची अधिकृत घोषणा करण्याविषयीसुद्धा पवार व सोनिया यांच्यात खलबते झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात … Read more

लग्न मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी !

पालनपूर :- शहरात एका तरुणाचे लग्न मोडले. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेतच त्याने पोलिसांच्या समोरच इमारतीवरून खाली उडी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वासणा गावातील राहुल वाल्मिकी (२१) याचे लग्न ठरले होते. परंतु नियोजित वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी तो शहरातील डॉक्टर्स हाऊस भागातील एका इमारतीवर आत्महत्या … Read more

महाजनादेश यात्रेमध्ये कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करणार ?

संगमनेर :- भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यात पुन्हा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मंडपाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अकोले येथून दुपारी १२ वाजता यात्रेचे संगमनेरमध्ये आगमन होईल. अकोले नाक्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, जाणता राजा मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

‘त्या’ पाणी योजनेशी विखेंचा संबंध नाही

संगमनेर :- अंभोरे ग्रामपंचायतीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २ कोटी १८ लाखांचा निधी मिळवला. त्यात मंत्री राधाकृष्ण विखेंचे कोणतेही योगदान नाही. निधी मिळाला तेव्हा विखे हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, असे सरपंच भास्कर खेमनर यांनी सांगितले. अंभोरे पेयजल योजनेच्या श्रेयावरून थोरात-विखे गटात कलगीतुरा रंगला … Read more

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात तेरा वर्षीय मुलीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार !

नागपूर :- तेरावर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर गावात संतापाची लाट पसरली असून या घटनेतील दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले आहेत. याप्रकरणी अमित ठाकूर (१८), बलवंत गोंड (२२) यांच्यासह दाेन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर … Read more

व्हीआयपी बंगल्यात घुसलेल्या बकऱ्यास पोलिस कोठडीची हवा

मुरैना : पाेलिस ठाण्यात चाेर-गुंड आदींना कोठडीत ठेवले जाते, हे एकले असेल. परंतु मध्य प्रदेशातील मुरैना शहर पाेलिस ठाण्यात एका बकऱ्याला रात्रभर पोलिस ठाण्याची हवा खावी लागली. या बकऱ्याचा दोष इतकाच होता की, एका व्हीआयपीच्या बंगल्यात घुसण्याचा गुन्हा त्याने केला होता. सकाळी बकऱ्याच्या मालकाला ही गोष्ट समजली. तेव्हा तो पोलिस ठाण्यात गेला आणि बकऱ्याला सोडवून … Read more

महिलेला चुकीचा स्पर्श केल्याने भारतीय व्यक्तीला दीड लाख रुपये दंडासह झाली हि शिक्षा !

सिंगापूर : सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला चर्चमध्ये महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने पाच दिवसांचा कारावास आणि २५०० सिंगापुरी डॉलर (सुमारे दीड लाख रुपये) दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. राजेंद्रन प्रकाश चर्चमध्ये दारू पिऊन गेला आणि त्याने एका महिलेला हात लावत गळाभेट घेतली. घटना गेल्या वर्षातील आहे. प्रत्यक्षदर्शी इयू सेंग की चर्चमध्ये प्रार्थना करीत होते, तेव्हा … Read more

कर्नाटकात मोबाइलसाठी मुलाकडून बापाचा खून

बेळगावी – मोबाइल वापरण्यास मनाई केल्याने मुलाने त्याच्या साठ वर्षीय बापाचा खून केल्याची घटना कर्नाटकातील ककाथी गावात सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापाचा खून करणाऱ्या मुलाचे नाव रघुवीर आहे. खून केल्यानंतरही समाधान न झाल्याने तो बापाच्या मृतदेहाचे तुकडे करू लागला. घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मृत वडील तीन महिन्यांपूर्वीच पोलिस … Read more

ताेडगा काढण्यासाठी साेनिया गांधी सक्रिय!

नवी दिल्ली :- मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात जाेरदार वादाला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सुटावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दुसरे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावले आहे.  विशेष म्हणजे हा वाद चिघळू नये म्हणून सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळे बोलावले आहे. सोनिया गांधी … Read more

राष्ट्रवादीनेच केले महाराष्ट्राचे वाटोळे!

अहमदनगर – राज्यात युती सरकारने मोठी भरीव विकास कामे केलेली आहेत. 10-15 वर्ष राज्यात सत्तेत असणार्‍यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही. साकळाई योजना फक्त विखेच करु शकतात असे सांगत विखे पाटील परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. उमेदवारीसाठी त्यांच्याकडे माणसे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉ. … Read more

प्रकाश आंबेडकरांकडून जनतेची दिशाभूल !

मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.  आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे … Read more

विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही : आ. राजळे

शेवगाव : आपल्याविरुद्ध बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने सध्या ते सोशल मीडियावर काही लोकांमार्फत टीका -टिपण्णी करत आहेत. कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे लक्ष देऊ नये. आगामी निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची व सन्मानाची आहे, असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले. तालुक्यातील शहरटाकळी येथे दहिगाव ने पंचायत समिती गणातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्ता मेळावा … Read more

पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर जाहीर

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गृहविभागाच्या पोलीस भरतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. दि. ३ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून दि. २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे. प्रथमच भरतीप्रक्रियेत गृहविभागाच्या वतीने मोठे बदल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच ही भरती होणार आहे. राज्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परिक्षेत्रात भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा होणाऱ्या … Read more

दोन तोंडाचा दुर्मिळ साप सापडला !

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या जंगलांमध्ये एका पर्यावरण सल्लागाराला विचित्र रुपाचा दुर्मिळ साप आढळून आला. हा साप पाहून तो थक्कच झाला. कारण सापाला चक्क दोन तोंडे आहेत. बर्लिंग्टन काउंटीतील हर्पेचोलॉजिकल असोसिएट्ससाठी काम करणाऱ्या दोन लोकांनी हा साप पकडला असून त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सापाला आता डेव असे नाव देण्यात आले आहे. कारण … Read more

पारनेर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका !

पारनेर :- तालुक्यातील वाळू तस्करांना पारनेर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील शिरसुले, शिक्री व कान्हूर पठार या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून सुमारे ६० लाख २८ हजार ६००रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर अवैध वाळू तस्करी प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील नदीसह अनेक ओढ्या नाल्यातून देखील वाळू … Read more