मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.
आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत
- Health Tips: सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तुम्ही देखील ‘हे’ पदार्थ खातात का? खात असाल तर होऊ शकते शरीराला नुकसान
- LIC policy : एलआयसीची ‘ही’ योजना करेल मालामाल, आजच करा गुंतवणूक…
- Best Affordable Cars : 5.50 लाख रुपयांच्या ‘या’ कारची चर्चा सर्वत्र, एप्रिल महिन्यात झाली सर्वाधिक विक्री!
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललय काय? लिलाव नाहीत तरी मुबलक वाळू, शहरासह ग्रामीण भागात कामे जोरात सुरु, वाळूचोरीने लाखोंच्या महसुलावर पाणी