सात वर्षांच्या लढयानंतर गोगलगाव मंगळापूर शिवरस्ता खुला

नेवासा ;- तालुक्यातील गोगलगाव-जुना मंगळापूर शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने हा रस्ता वहिवाटीस बंद होता. त्यामुळे या परिसरातील काही शेतकर्यांना रस्ता नसल्याने शेती कसता येत नव्हती. या संदर्भात येथील महिला शेतकर्याने महसूल प्रशासनाकडे सलग सात वर्षे पाठपुरावा केला. या त्यांच्या लढयाला यश आले असून हा रस्ता खुला झाला आहे. हा दीड किलोमीटरचा रस्ता खुला झाल्याने या परिसरातील … Read more

माजी आमदार अनिल राठोड अस्वस्थ, अहमदनगर शहर शिवसेनेत उभी फूट !

अहमदनगर :- शिवसनेचे उपनेते अनिल राठोड हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. मात्र असे असताना शिवसेनेच्या माजी महापौर शीला शिंदे त्याचप्रमाणे माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम हेदेखील विधानसभेची तयारी करत आहेत. उपनेते राठोड यांच्या बरोबरीने शिंदे व कदम यांनी वरिष्ठांकडे शहर विधानसभेवर शिवसेनेच्या उमेदवारीचा हक्क सांगितला. … Read more

काँग्रेसला धक्का, आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत !

श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. … Read more

जळालेल्या खरीपाची नुकसानभरपाई द्यावी – माजी आ. शंकरराव गडाख

नेवासा –  चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप … Read more

नराधम पतीकडून गुप्तांगात काठी ठेचून पत्नीची हत्या !

अमरावती : शेतात रखवालदार म्हणून काम करणाऱ्या दारूड्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. क्रौर्याची परिसीमा गाठून पत्नीच्या गुप्तांगात काठी ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना नजीकच्या धोतरखेडा शेतशिवारात आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी क्रूरकर्मा पतीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू तोटा चढोकार (५०) रा.कामीदा, … Read more

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. कर्डिले

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी … Read more

अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

कर्जत : तालुक्यातील जलालपूर शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे याचा पोलिस तपास करत आहेत.जलालपुर गावच्या शिवारात नवनाथ आत्माराम बाबर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात … Read more

पाणी मागितले तर गोळ्या घातल्या हा इतिहास जनता कधीही विसरणार नाही!

कर्जत – राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे असा प्रश्­न करीत ही तर केवळ गुंडांची टोळी असून मी तर त्या पक्षाचे नाव अलीबाबा चालीस चोर असे ठेवले असल्याचे प्रतिपादन पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राशीन गावासाठी १३ कोटी ३१ लाख रूपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ मंत्री श्री. खोत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला पाण्यात !

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रोड परिसरात राहणारे रामदास भिमराव कडनोर, वय ३४ यांचा टणक हत्याराने डोक्यात मारहाण करुन खून करण्यात आला. हा खुन करुन रामदास कडनोर यांचा मृतदेह प्रवरा कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून देण्यात आला. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी वार्ड नं. २ येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह आढळला व खुनाचा प्रकार उघड झाला. … Read more

भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक : आ. डॉ. तांबे

अहमदनगर : आज जे स्वार्थी लोक पक्षांतर करत आहेत ते कुठेच टिकणार नाहीत. काँग्रेस पक्षातून असे लोक बाहेर पडत असले तरी पक्ष पुन्हा मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाची उभारणी सामाजिक चळवळीतून झालेली असून याच चळवळीच्या माध्यमातून पक्षाने देशात काम केले आहे. आज देशावर मोठे संकट आलेले असून जेव्हा लोकांना हे संकट समजेल तेव्हा … Read more

१ सप्टेंबरला भाजपात मेगाभरती, काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका, हे दिग्गज नेते मंडळी करणार भाजप प्रवेश !

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपा काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा मोठा झटका देण्यास सज्ज झाली आहे. १ सप्टेंबरला भाजपात आता मेगाभरती होणार असून या वेळी नारायण राणे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे राणा जगजीतसिंह, जयकुमार … Read more

झेडपी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढे ढकलल्या

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या नव्याने होणाऱ्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात जिल्हा प्रशासन व पोलिस व्यस्त असल्याकारणाने नव्याने होणाऱ्या पधाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलली आहे. पदाचा कालावधी समाप्त झाल्यापासून १२० दिवसाच्या आत या … Read more

विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले, पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू … Read more

जामखेड शहरासाठी ११७ कोटींची पाणीयोजना मंजूर!

जामखेड : जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोत्थान महाअभियानांतर्गत ११७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याबाबत मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना दिले. यामुळे जामखेड शहरापुढील तीस वर्षांपर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महीला जागीच ठार

पारनेर ;- प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली. राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील राधाबाई कारभारी … Read more

विकासकामांमुळेच जनता माझ्यासोबत – आ.राहुल जगताप

श्रीगोंदा: श्रीगोंदा -नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून पाच वर्षांत श्रीगोंदा नगर तालुक्यात मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत, त्या विकासकामांमुळेच जनता आपल्यासोबत असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुरेगाव ते घुटेवाडी या २.५० कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील … Read more

मुलासोबत झालेल्या भांडणातून श्रीगोंद्यातील सातवीच्या विद्यार्थिनींनीच केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव !

श्रीगोंदा :- शाळेत जाण्याचा कंटाळा व रस्त्याने जाताना वर्गातील मुलासोबत झालेल्या वादावरून शाळेत शिक्षक ओरडतील या भीतीमुळे शाळेत जायचे नाही म्हणून सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणींनी घरी न जाता वाट सापडेल तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु एका शिक्षकाच्या जागरुकतेमुळे या मुली पुन्हा घरी सुखरूप पोहोचल्या खऱ्या परंतु पालक ओरडतील म्हणून या मुलींनी आयडियाची कल्पना करून … Read more

पाणी द्या; अन्यथा धडा शिकवू – खा. सदाशिव लोखंडे

राहुरी : तालुक्यातील ३२ गावातील व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांसाठी योग्य क्षमतेने पाणी मिळत नाही. टेल टू हेडवरील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभे राहून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला. मुळा व भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडले गेलेले आवर्तन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत … Read more