गॅस वापरता येत नाही विवाहितेचा छळ

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा येथे राहणारी विवाहित तरुणी सौ . पूजा सुनील भांगरे , वय २६ वर्ष हिला सासरी नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी तुझ्या माहेरुन दागिने घेवून ये , तुला कपडे धुता येत नाही ! स्वयंपाक करता येत नाही ! गॅस वापरता येत नाही या कारणावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ … Read more

पुरग्रस्तांसाठी सरसावले शालेय विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवलेल्या जलप्रलयानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठे सर्वजन आपल्या परीने पुरग्रस्तांसाठी मदत पाठवित आहे. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैश्यासह घरोघरी जाऊन सुमारे 31 हजार रु. चा मदतनिधी जमा केला. … Read more

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी

कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या नगर जिल्ह्यातील सभा रद्द

अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच … Read more

एकाच दिवशी एकाच वेळी भाजप ची महाजनादेश’ आणि राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा या तालुक्यात येणार समोरासमोर

जामखेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व राष्ट्रवादीचे खासदार असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा या दिवशी दुपारी ४ वाजता जामखेडला समोरासमोर येणार आहेत. या यात्रांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्या तरी यानिमित्ताने भाजप व राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन या दिवशी जामखेडात होणार असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश … Read more

पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर

अहमदनगर – २०१४ मध्ये लोकांनी रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नविन पॅकिंग मधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. पण हा रिजेक्टेड माल जनता कसे स्विकारेल ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत राज्याचे राजकारण नवीन स्टाईलने सुरू झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असून ईडी, सिबीआय चा धाक दाखवून विरोधकांना पावन करून घेतले जात … Read more

माजी आमदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे व चंद्रशेखर घुले यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केल्याने बँक अडचणीत सापडली. त्य़ामुळे यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर निकाल देताना संबंधितांविरुद्ध पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे २००५ ते २०१० या काळात या बँकेवर … Read more

श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, … Read more

रखडलेले मूलभूत प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले : राठोड

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम शिवसेनेने केले आहे. आज सुरू करण्यात आलेले रस्त्याचे काम १५ वर्षांपासून रखडले होते. मागील काळात या भागातून निवडून आलेल्या विरोधी नगरसेवकांनी फक्त पदे भूषविली आणि विकासकामांत खोडा घालण्याचे काम केले. जेव्हा जेव्हा मनपावर युतीची सत्ता राहिली, तेव्हा शहरातील विकासकामांना वेग आला. विरोधकांची सत्ता असताना विकासकामे … Read more

कांदा मागितल्याने तिघास बेदम मारहाण

अहमदनगर : तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळील राजविर हॉटेल व लॉजिंगवर कांदा मागितल्या कारणावरून तिघास लोखंडी पाईप, खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात ६जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाजीराव चोभे, लखन चोभे, दत्ता चोभे, बंडू सावळे (सर्व. रा.बाबुर्डी बेंद ता. नगर), अक्षय रोकडे रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा) … Read more

धनुभाऊ, बोलण्याआधी आपली पात्रता तपासा !

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माजीमंत्री बबनराव पाचपुते भाजपसाठी पूर्वी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीका त्यांनी काल जिंतूर येथे बोलताना केली होती मात्र आता यावरून चांगलेच वाद झाले आहेत माजी मंत्री बबनराव पाचपुते … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व सायंकाळी पारनेरचे युवा नेते नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुळे … Read more

ते नेते उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीसाठी दोन दिवसांपूर्वी नगरला झालेल्या जिल्हा भाजप कोअर कमिटी बैठकीस अकोल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश दिलेल्या अकोल्याच्या आमदार वैभव पिचडांचे कट्टर विरोधक म्हणून भांगरे ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर आता भांगरेंचे करायचे काय, असा प्रश्न जिल्हा भाजपच्या … Read more

एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

नवी दिल्ली :- आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार, चिदंबरम यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळपास 95.66 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्याच्यावरही पाच कोटी रुपयांचं कर्ज आहे. देशातच नाही तर विदेशातही त्यांचे अनेक बंगले आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. यामध्ये कोटींची एफडी आणि वार्षिक उत्पन्न 8.6 कोटी इतकं आहे. ही चिदंबरम यांची कौटुंबिक संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडून घोषित … Read more

चारा छावणी बंद केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर :- कर्जबाजारी असलेल्या व त्यातच चारा छावणी बंद केल्याने एका दिव्यांग शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील खांडके येथे गुरुवारी घडली. लक्ष्मण संपत गाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गाडे यांच्या आत्महत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी रस्त्यावरील कौडगाव येथे रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. नगर दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

‘या’ गावाने घेतला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

नगर – गोंडेगाव येथील पाझर तलाव भरून देण्यासाठी केलेल्या रास्तारोकोप्रसंगी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाव भरण्याचे लेखी अश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमुखी घेतला. गोंडेगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी टंचाईमुळे संतप्त शेतकर्‍यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर – पुणतांबा राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी … Read more

‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले, बबनराव … Read more