बुलढाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

बुलढाणा, (जिमाका) दि. 4 : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत 24 रूग्ण बाधित केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना निवळण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. आज चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू … Read more

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे विभागाचा आढावा

पुणे, दि. 4 : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. विभागीय आयुक्त  कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. … Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींची मदत

मुंबई, दि. 4 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद … Read more

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात ९२ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि. ०४ : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२,१६१ गुन्हे दाखल झाले असून १८,२१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात (१४,७५२) झाली असून सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (७२), रत्नागिरी (७५) जिल्ह्यात आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल

मुंबई, दि. 4 : कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल मध्ये शिथिल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या वतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोनाचा धोका … Read more

रोजगार देणारे उद्योग तातडीने सुरू करा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा, दि, ४- टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्ह्यात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम पातळीवर … Read more

…आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

नंदुरबार, दि.4 : …जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते. त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची गरज असताना पोस्ट खाते मदतीला धावून आले आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक … Read more

एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात

पुणे, दि. 04 : कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना … Read more

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मुंबई, दि ४ : अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच,पोलिसांनी एकास घेतले ताब्यात !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सूत्रांकडून समजले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, खून करण्याच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरूण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून … Read more

महत्वाची बातमी : जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात विविध बाबींना सवलती

अहमदनगर, दि.०४ – लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली या ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दिनांक 04 मे ते दि. 17 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत … Read more

अहमदनगरकरानों ही माहिती तुमच्यासाठी वाचा…तुमच्या परिसरात काय असेल चालू आणि बंद ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा पाटात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीरामपूर येथील तेजस दळवी या १८ वर्षांच्या युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह सापडला. तेजस शनिवारी दुपारी दिऊरा रोडवरील गणपती मंदिराच्या मागे पोहोण्यासाठी चार-पाच मित्रांसह गेला होता. तेजसला पोहता येत नसल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडाला. तेजस पाण्यात वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर शोधकार्य … Read more

‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ … Read more

कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. -पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या … Read more

राज्यातील कंन्टेटमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

मुंबई, दि. 3 – राज्यातील कोविड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई  … Read more

नागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना

नागपूर दि 3 –  लॉकडाउनमुळे नागपूर विभागात  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ  विशेष  श्रमिक स्पेशल रेल्वे  गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली. पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले. श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये  … Read more

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. ३ : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण  १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात … Read more