जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणला भाजपचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे.

तसेच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन करण्यात येणार आहे .

कोरोनाच्या काळात महावितरणकडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे.

अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News