झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

उद्या आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार ?

२१ ऑक्टोबरला होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्याविषयी आता नव्याने वावड्या उठायला लागल्या आहेत. अर्थात या वावड्या आहेत म्हणून की काय, या दोघांकडूनही यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र येत्या दि. २४ रोजी आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असून माजी आ. … Read more

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त करण्याची जबाबदारी माझी

जामखेड : कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस्च्या उमेदवाराचे डिपाजीट जप्त करण्याची जबाबदारी विखे पाटील यांची आहे. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही. असा टोला खा.डॉ.सुजय विखे रोहित पवार यांचे नाव न घेता लावला. जप्त करण्याची जबाबदारी आपली जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे … Read more

लाच घेताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला अटक

श्रीरामपूर : श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मासिक हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना अहमदनगर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदार यांचा श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर मिल्क स्टॉल आहे. हा स्टॉल चालू राहाण्याकरीता मासिक हप्ता म्हणून पोलीस नाईक वैजनाथ … Read more

उसा अभावी ‘नागवडे साखर कारखाना’ बंद राहणार

श्रीगोंदा : यावर्षी ऊस नसल्याने कारखान्याचा हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. मागील हंगामातील उसाची बिले जिल्ह्यात सर्वांत अगोदर देण्याचे काम नागवडे कारखान्याने केले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यस्थळावर कमी खर्चात उसाचे बेणे देखील उपलब्ध करून दिले होते. असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले. नागवडे सहकारी कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

अहमदनगर : काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन … Read more

अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे यांच्या सह राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर: राष्ट्रवादीच्या दोन गटात नगर शहरातील नंदनवन लॉनसमोर झालेला राडा आणि त्यानंतर दोन्ही गटांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, प्रकरण आपसात तडजोड होऊन मिटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे,यांच्या सह राष्टवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more

भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणतात रोहित पवारांच्या कामाने मी प्रभावित झालो!

जामखेड :- पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद … Read more

काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल !

संगमनेर :- काँग्रेसची अंतिम यादी निश्चित झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसमधून आजपर्यंत अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, आता सकाळपासूनच आमच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

कर्जत-जामखेड विधानसभेची निवडणूक विखे यांच्या अस्तित्वाची लढाई !

जामखेड :- जिल्ह्याच्या व कर्जत-जामखेड तालुक्यातील सुपुत्राची आपल्या विकास करण्यासाठी गरज आहे, बाहेरच्या उसण्याची उधारीची गरज नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी रोहित पवार यांच्याावर नाव न घेता केली.जामखेड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, … Read more

आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषदेत सामसूम

अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू … Read more

‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली … Read more

आदिवासींच्या आरोग्यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा

आदिवासींच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स, संशोधक, अभ्यासक आणि वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव माननीय दीपक खांडेकर यांनी केलं आहे. आगामी काळात आपण सहकार्याने आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत सुसंवादाचे पूल बांधू आणि आपल्या आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि केंद्र सरकारचे आदिवासी विकास … Read more

रस्ता ग्रामीण भागात महत्त्वाचा घटक : आ.जगताप

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील जनतेसाठी रस्ता हा महत्वाचा घटक आहे. रस्ता चांगला असेल तर आपला शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहचवणे त्यांना सहज शक्य होते. वेळेत माल पोहचविला तर बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे रस्ता हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. असे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. कोळगाव ते गुंडेगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात … Read more

पोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण

संगमनेर : शेतजमिनीच्या कारणावरून पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. म्हणून त्याचा राग अनावर झाल्यामुळे बारा जणांनी एकत्र येत पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकूण बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येथील घटना याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली … Read more

भाजप नगरसेवकाकडून युवकास लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर : मनोज दुल्लम याने युवकास विनाकारण लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना सावेडीतील कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुल्लमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सागर अरुण घोरपडे (वय २५, रा.लालटाकी, नगर) हा युवक जखमी झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेल येथे … Read more

राष्टवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांना धक्क्काबुक्की !

अहमदनगर :- राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असतांनाच माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर … Read more

निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत. हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस … Read more