मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ.निलेश लंके

पारनेर :- सत्ता उपभोगण्यासाठी निवडून आलेलो नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब व तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला जनतेने सेवक म्हणून निवडून दिले आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या सोडवू, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. पारनेरचे नवनिर्वाचित आमदार लंके यांचा घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. योगेश … Read more

६ वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या मुलाकडून बलात्कार

राहुरी :- तालुक्यातील एका गावातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ ते १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला. त्यानंतर शेजारीच राहणारा हा आरोपी मुलगा पळून गेला. याप्रकरणी आज पिडीत मुलीचे नातेवाईक लहान मुलीला घेवून पोलिसांकडून आले होते. राहुरी पोलिसांनीही घटनेची गांभिर्य लक्षात घेवून आरोपी … Read more

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघासह नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नसून, त्याला जिल्हाप्रमुख जबाबदार आहेत. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हाप्रमुखांची तत्काळ हकालपट्टी करावी, असा सूर पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत आळवण्यात आला. विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदारसंघातून विजय … Read more

मी आमदार असलो तरी साहेब नको, दादाच म्हणा : आ.प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : मी जरी आमदार झालो असलो तरी माझं वय तरुणांच्या बरोबरीच आहे,त्यामुळे कार्यकत्यांर्सह हितचिंतकांनी मला साहेब न म्हणता बंधुत्वाच्या नात्याने दादाच म्हणावे, असे आवाहन राहुरी- नगर- पाथर्डीचे नवनिर्वाचित आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाथर्डी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला ज़ाईल, असेही आ. तनपुरे या वेळी … Read more

शेतीचे सरसकट पंचनामे करा : माजी आ.राहुल जगताप

श्रीगोंदा : सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी काल आमदार राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशींच्या पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी.आ.राहुल जगताप यांनी राज्य तसेच केंद्र सरकार मार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण … Read more

शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे हतबल

अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे. यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे.  पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा … Read more

आ.मोनिका राजळे चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर !

अहमदनगर :- आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आ. राजळे यांचा लहान मुलगा कबीर यास डेंग्यू झाल्याने सध्या तो नगर येथे उपचार घेत आहे. त्या स्वतः सुध्दा आजारी असून सत्कार न घेता त्या चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर गेल्या. बाजरीच्या कणसाला आलेले मोड, शेतात … Read more

रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.  सरकार स्थापनेला होत असलेल्या उशीरामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं  रोहित पवार यांनी … Read more

वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली. आदिती … Read more

कांद्याची सहा हजारांकडे झेप

अहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला. सततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी … Read more

सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी

करंजी : राहुरी- नगर -पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, या सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करू, असे प्रतिपादन राहुरीचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील मतदारांचे आभार मानण्यासाठी आ. तनपुरे आले असता, चिचोंडी येथे ते बोलत होते. . आ. तनपुरे … Read more

आमदार रोहित पवारांकडून अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या परतीची पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, बाजरी,ज्वारी, कांदा, सोयाबीन, ऊस आदी पिके अतिरिक्त पावसाने वाया गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने रानात तुडुंब पाणी साठले असल्याने अनेक पिके … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू- आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वत: उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आपल्या सुचनेवरून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ.पाचपुते बोलत होते. ते … Read more

अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली. याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक … Read more

मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवण्यात येणार

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. … Read more