विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाही : आ. राजळे

शेवगाव : आपल्याविरुद्ध बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने सध्या ते सोशल मीडियावर काही लोकांमार्फत टीका -टिपण्णी करत आहेत. कार्यकर्त्यांनी मात्र त्याकडे लक्ष देऊ नये. आगामी निवडणूक ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची व सन्मानाची आहे, असे प्रतिपादन शेवगाव – पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांनी केले. तालुक्यातील शहरटाकळी येथे दहिगाव ने पंचायत समिती गणातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्ता मेळावा … Read more

पारनेर पोलिसांचा वाळू तस्करांना दणका !

पारनेर :- तालुक्यातील वाळू तस्करांना पारनेर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील शिरसुले, शिक्री व कान्हूर पठार या ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करून सुमारे ६० लाख २८ हजार ६००रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर अवैध वाळू तस्करी प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील नदीसह अनेक ओढ्या नाल्यातून देखील वाळू … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती. याचवेळी … Read more

मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …

कर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले. कर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

बापूंना जाऊन एक वर्ष झाले, तरी त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत…

श्रीगोंदे ;- बापूंनी आयुष्यभर पुण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर आणि कामांवर प्रेम करणारा समाज आज येथे उपस्थित आहे. बापूंचे कार्य आणि नाव सदैव तेवत राहील असे काम करूया, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटील बोलत होते. बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना ‘नागवडे’चे … Read more

नगर-पुणे महामार्गावर अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

पारनेर :- नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात झालेल्या अपघातात अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे सव्वाच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले आहेत. लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला. जखमींमध्ये किसन … Read more

‘बबनराव मी कायम रिचेबलच असतो’ हर्षवर्धन पाटील यांचे पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर

श्रीगोंदा : स्व.शिवाजीराव (बापू)नागवडे यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली.कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रपंच बापूंनी उभे केले. सहकारातही बापूंचे सिंहाच योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सहकारी साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संस्थापक श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांच्या प्रथम … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी निवडणुकीवर बहिष्कार !

शेवगाव :- तालुक्यातील आव्हाणे बु. ते रामनगर, या रस्त्याची अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी दिला आहे. आव्हाणेपासून जवळच असणाऱ्या रामनगर येथे एक हजार लोकवस्ती असून, दळणावळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

भाजपमध्ये कोणीही येऊ द्या , पण श्रीगोंद्याच्या उमेदवारीची शिफारस बबनराव पाचपुते यांचीच : खा. डॉ. सुजय विखे

श्रीगोंदा :- भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात मला चांगले माताधिक्य मिळवून दिले , त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार , असे  खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले. पंचायत समितीचे सभापती शहाजी हिरवे यांनी खेतमाळीसवाडी ( पारगाव ) येथे आयोजित केलेल्या माजी … Read more

दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे !

कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे. कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. महासंग्राम युवा मंच हे नामदेव … Read more

नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पाठवा…

जामखेड :- असंघटित कामगारांकरिता राज्यात काही ठिकाणी कामगार कल्याण मंडळाकडून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. ही व घरकुल योजना लवकरच नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याण मंत्री संजय भेगडे यांनी रविवारी केली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना २९ कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम चौंडीत झाला. … Read more

दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज !

श्रीगोंदे :- दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा दलित, आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष ही आणखी चिंताजनक बाब आहे. महिलांना नग्न करून मारहाण करणे, बलात्कार, लहान मुलांवर धारदार शस्त्रांनी वार, प्राणघातक हल्ला अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढवळगाव येथील … Read more

मी सूडाचे व उधारीचे राजकारण करीत नाही. हिशोब पूर्ण करतो – खासदार डॉ. सुजय विखे

राहुरी – आमचे ठरले आहे. आमदार शिवाजी कर्डिले आणि लोकसभेत डॉ. सुजय विखे पाटील प्रतिनिधित्व करतील. विखे कर्डिले युती विकासासाठी असून ती अतूट असल्याची ग्वाही आमदार शिवाजी कर्डिले व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. काल राहुरीत आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. आ.कर्डिले अध्यक्षस्थानी होते. भैय्यासाहेब शेळके मित्रमंडळ, तालुका विकास मंडळ, परिवर्तन … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून गुन्हेगार आणि दहशत माजवणाऱ्याना संरक्षण !

अहमदनगर :- भाजप तालुकाध्यक्ष व त्यांच्या साथीदारांपासून मुक्ती मिळावी, मालकीच्या जागेवर कंपाऊंड बांधून केलेले अतिक्रमण त्वरित थांबावे व भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा इच्छा मरणास परवानगी द्यावी आदीमागण्यांसाठी कल्याण सुरवसे यांच्या कुटुंबाने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कल्याण सुरवसे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मी … Read more

श्रीगोंद्यातील ‘त्या’ खून प्रकरणातील सर्व आरोपींना २४ तासांत अटक

श्रीगोंदे: भानगाव खूनप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. मुख्य आरोपीसही बेड्या ठोकण्यात आल्या. २४ तासांत सर्व आरोपी जेरबंद केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी शनिवारी दिली. नानासाहेब ज्ञानदेव आघाव याच्या भानगाव येथील शेतजमिनीची मोजणी ५ सप्टेंबरला भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात झाली. मोजणी करून अधिकारी व कर्मचारी गेल्यानंतर शेत मोजणीच्या ठिकाणी दुपारच्या … Read more

भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदी

अहमदनगर ;- भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशातील युवकांना नोकर्‍या तर मिळाल्या नसून, आहे त्या नोकर्‍या देखील धोक्यात आल्या आहेत. शाश्‍वत विकासाचा पर्याय राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांना दिसत आहे. अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राष्ट्रवादीत नेहमीच न्याय व सन्मान देण्याचे काम करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी … Read more

नव्या पवारांचा उदय होतोय,उद्धव ठाकरेंकडून रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

अहमदनगर :- बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या … Read more