शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more

‘या’दिवशी होवू शकतात विधानसभा निवडणुका

अहमदनगर ;- विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी 31 तारखेला प्रसिध्द करण्यात येणार असून शनिवारी यादीवर निर्णय घेण्याचा अंतिम दिवस होता. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज … Read more

पुरग्रस्तांसाठी सरसावले शालेय विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवलेल्या जलप्रलयानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठे सर्वजन आपल्या परीने पुरग्रस्तांसाठी मदत पाठवित आहे. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैश्यासह घरोघरी जाऊन सुमारे 31 हजार रु. चा मदतनिधी जमा केला. … Read more

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी

कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या नगर जिल्ह्यातील सभा रद्द

अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

एकाच दिवशी एकाच वेळी भाजप ची महाजनादेश’ आणि राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा या तालुक्यात येणार समोरासमोर

जामखेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व राष्ट्रवादीचे खासदार असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा या दिवशी दुपारी ४ वाजता जामखेडला समोरासमोर येणार आहेत. या यात्रांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्या तरी यानिमित्ताने भाजप व राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन या दिवशी जामखेडात होणार असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश … Read more

पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर

अहमदनगर – २०१४ मध्ये लोकांनी रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नविन पॅकिंग मधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. पण हा रिजेक्टेड माल जनता कसे स्विकारेल ? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत राज्याचे राजकारण नवीन स्टाईलने सुरू झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असून ईडी, सिबीआय चा धाक दाखवून विरोधकांना पावन करून घेतले जात … Read more

माजी आमदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे व चंद्रशेखर घुले यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केल्याने बँक अडचणीत सापडली. त्य़ामुळे यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर निकाल देताना संबंधितांविरुद्ध पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे २००५ ते २०१० या काळात या बँकेवर … Read more

रखडलेले मूलभूत प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले : राठोड

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम शिवसेनेने केले आहे. आज सुरू करण्यात आलेले रस्त्याचे काम १५ वर्षांपासून रखडले होते. मागील काळात या भागातून निवडून आलेल्या विरोधी नगरसेवकांनी फक्त पदे भूषविली आणि विकासकामांत खोडा घालण्याचे काम केले. जेव्हा जेव्हा मनपावर युतीची सत्ता राहिली, तेव्हा शहरातील विकासकामांना वेग आला. विरोधकांची सत्ता असताना विकासकामे … Read more

कांदा मागितल्याने तिघास बेदम मारहाण

अहमदनगर : तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळील राजविर हॉटेल व लॉजिंगवर कांदा मागितल्या कारणावरून तिघास लोखंडी पाईप, खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात ६जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाजीराव चोभे, लखन चोभे, दत्ता चोभे, बंडू सावळे (सर्व. रा.बाबुर्डी बेंद ता. नगर), अक्षय रोकडे रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा) … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व सायंकाळी पारनेरचे युवा नेते नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुळे … Read more

चारा छावणी बंद केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर :- कर्जबाजारी असलेल्या व त्यातच चारा छावणी बंद केल्याने एका दिव्यांग शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील खांडके येथे गुरुवारी घडली. लक्ष्मण संपत गाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गाडे यांच्या आत्महत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी रस्त्यावरील कौडगाव येथे रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. नगर दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

‘या’ गावाने घेतला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

नगर – गोंडेगाव येथील पाझर तलाव भरून देण्यासाठी केलेल्या रास्तारोकोप्रसंगी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाव भरण्याचे लेखी अश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमुखी घेतला. गोंडेगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी टंचाईमुळे संतप्त शेतकर्‍यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर – पुणतांबा राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी … Read more

‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले, बबनराव … Read more

खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणूक लढवू

शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत, व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष … Read more

शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अर्जुन सुखदेव मोरे व मंदा अर्जुन मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चंद्रकला मोरे या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. या … Read more

होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

राहाता : येथील पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी गेलेल्या महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निजाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता शेख याने पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी तैनात असलेल्या महिला होमगार्डशी अश्लिल भाषेत संवाद साधला. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more