तुकड्यातील जमिनीच्या दस्तांची नोंदणी आणखी काही काळ स्थगित

Maharashtra News

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने तुकडेबंदीसंदर्भात दिलेल्या निकालाविरोधात नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या दस्तांची नोंदणी सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुकडेबंदीला विरोध करणारी शासनाची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली. त्याबाबतचा निकाल १३ एप्रिल रोजी दिला होता. हा … Read more

गणेशोत्सवासाठी १५६ गणपती विशेष गाड्या २७ जूनपासून बुकिंग सुरू

Maharashtra News

Maharashtra News : अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी तिकीट बुकिंग करणाऱ्या चाकरमान्यांना अवघ्या काही मिनिटांतच आरक्षण फुल्ल झाल्याचा अनुभव आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी १५६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, … Read more

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात ३५० जागांची भरती !

Jobs News

Jobs News : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची पदे भरली जाणार आहेत. सुमारे ३५० जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या … Read more

दुधाच्या दरात मोठी घसरण पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक संकटात

Ranchers in crisis

जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूध दरात मोठी घसरण झाली असून, ४० रुपयांपर्यंत गेलेले दर ३२ रुपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने दुधाळ जनावरे सांभाळायची कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे दुधव्यवसाय अडचणीत सापडला असून, सध्या हिरवा चाऱ्याचे वाढलेला … Read more

पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल ! पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला साकडं

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव, आव्हाणे, परिसरातील शेती मशागतीची कामे झाली असून, यावर्षी पावसाचे आर्द्रा आणि मृग नक्षत्र कोरडे चालल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत, विठुरायाच्या दर्शनाचीही ओढ लागल्याने शेतीची कामे उरकावी म्हणून लवकर पाऊस पडण्यासाठी पांडुरंगाला वारकऱ्यांनी साकडं घातलं आहे. मागील वर्षी २८ मे रोजी झालेल्या पावसावरच १५ जून दरम्यान कपाशीच्या लागवडी पूर्ण झाल्या … Read more

Ahmednagar Politics : नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आमदार लंके यशस्वी..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड … Read more

पंढरीच्या वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज ! थेट तुमच्या गावापासून मिळणार सेवा…

Maharashtra News

Maharashtra News : पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीसाठी लाल परी सज्ज झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने तब्बल ४०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. दि.२५ जून ते दि.३ जुलैच्या कालावधीसाठी एसटी बसेसच्या फेऱ्या नगर जिल्ह्यातून पंढरपूरसाठी होतील. नगर शहरात तारकपूर बसस्थानक येथे यात्रा केंद्र असून पंढरीसाठी मार्गस्थ झालेल्या बसेस विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापर्यंत धावतील. ४५ … Read more

Ajab Gajab News : जगातील सर्वात मोठे घर, या जागेत वसवले जाऊ शकते एक छोटे शहर !

जगामध्ये आणि भारतामध्ये अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आहेत. जे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असून त्यांच्या या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ते इतर ठिकाणांपेक्षा वेगळे असतात. म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारची ठिकाणी जगात आणि भारतात बऱ्याच ठिकाणी आहेत. भारतामध्ये अशा अनेक वास्तू आहेत ज्यांची निर्मिती पुरातन काळी अनेक राजा महाराजांकडून करण्यात आलेली असून त्याकाळचे वास्तु … Read more

Property Act information : मुलांच्या संपत्तीवर पालकांचा किती असतो हक्क ? पत्नीचा काय असतो अधिकार ? वाचा महत्त्वाची कायदेशीर माहिती

संपत्तीच्या विषयी बऱ्याचदा आपण ऐकतो किंवा साधारणपणे चर्चा असते की पालकांच्या संपत्तीवर मुलांचा आणि मुलीचा किती अधिकार असतो? याबाबत देखील कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीच्या वाटपावरून वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे बरेच पालक मृत्युपत्राच्या माध्यमातून मुलांमध्ये संपत्तीचे योग्य पद्धतीने वाटप करतात. परंतु या उलट मुलांच्या संपत्तीवर अथवा मालमत्तेवर … Read more

Monsoon 2023 : महाराष्ट्र हवामान अंदाज नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड मधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी…

महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा मिळताना दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सून हा कोकणामध्येच रखडलेला होता. परंतु त्याला आता काहीशी गती मिळताना दिसून येत असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मान्सूनचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे आता मान्सूनच्या दिलासादायक बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यासह … Read more

Business Idea: दिवसाला 4 ते 5 हजार रुपये कमवायची इच्छा आहे का? तर सुरू करा हा व्यवसाय, होईल फायदा

शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागणे म्हणजेच आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण उध्वस्त करण्यासारखे आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, शिक्षणाच्या मानाने म्हणजे दरवर्षी पदवी घेऊन महाविद्यालयांच्या बाहेर निघणाऱ्या तरुण-तरुणींच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संख्या अत्यंत अल्प आहे. त्यातल्या त्यात ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या टिकतील याची शाश्वती अजिबात नाही. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता … Read more

खुशखबर ! आता पिंपरी, निगडीमध्ये मिळणार फक्त 8 लाखात घर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज, वाचा

Pune News : आपल्यापैकी अनेकांचे घराचे स्वप्न असते. आपलेही हक्काचे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर घर खरेदी करणे अवघड बाब बनली आहे. घरांच्या किमती ह्या खूप वाढल्या आहेत. अशातच जर पिंपरीसारख्या भागात घर घेण्याचे ठरवले तर खिशात लाखो रुपयांचा … Read more

Railway News : कुठल्याही मदतीसाठी रेल्वेची एकच हेल्पलाइन ! प्रवाशांना मिळणार…

Maharashtra News

ओरिसामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आपातकालीन स्थितीमध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या १३९ या हेल्पलान क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे. त्यामुळे तातडीने मदत मिळू शकणार आहे. प्रवाशांना सर्व माहिती तक्रारी आणि समस्यांसाठी एकच हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवण्याची प्रवाशांना गरज नाही. देशभरात केवळ एकाच हेल्पलाइनवर मदत मिळणार … Read more

पावसाचा अद्याप पत्ताच नाही खरिपाच्या पेरण्याच करायचं काय ?

पावसाने ओढ दिल्याने टाकळीभान परिसरातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणी लांबल्याने शेतकरी राजावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. ऐरवी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने झालेल्या पेरण्या निरोगी असतात. मात्र, संपूर्ण जून महिना संपत आला असून अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. मान्सून लांबणीवर … Read more

Shirdi News : साईबाबा आणि साईसंस्थानची बदनामी करणारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई

अनेक भाविकांच्या तक्रारीनंतर साईबाबा आणि साईसंस्थानची समाज माध्यमांद्वारे बदनामी करणारांच्या विरोधात साईसंस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भाविकांनी अशा बदनामीकारक मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईसंस्थानचे सीईओ पी शिवा शंकर यांनी केले आहे. संस्थानच्या तक्रारीनंतर सायबर सेल सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. संस्थानचे सीईओ यांनी राज्याच्या सायबर सेलचे प्रमुख … Read more

दूध भेसळीचे काळे वास्तव समोर ! दुधात होणारी भेसळ अतिशय गंभीर

राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांसह भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्यांवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करण्याचा इशारा नुकताच दिला आहे. यामुळे दूध भेसळीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील एका दूध भेसळखोरावर कारवाईचा बडगा उगारताच एका दिवसात एका तालुक्यातील दुधाचे प्रमाण ६० हजार लिटरने कमी आल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले दुधात होणारी … Read more

दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज ! सरकार आणणार नवे नियम

Electricity

सध्या महागड्या विजेमुळे जनता त्रस्त आहे. अशा वेळी केंद्र सरकार एका नवा फॉर्म्युला आणण्याच्या विचारात आहे. तो अमलात आणल्यास विजेचे बिल सुमारे २० टक्क्यांनी घटू शकते. हा फॉर्म्युला पिक अवर अर्थात सर्वाधिक वीजवापराच्या तासांवर ठरणार आहे. ऊर्जा मंत्रालय लवकर वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे. नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. … Read more

गायीच्या दूधाला किमान ३५ रुपये भाव !

milk production

गायीच्या दूधाला किमान ३५ रुपये भाव द्यावा व दूध भेसळ रोखावी, असे निर्देश दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे ‘पाटील यांनी खाजगी व सहकारी दूध संस्थाना नुकतेच पुण्यात एका बैठकीत दिले. त्यामुळे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती दुग्ध विकास मंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत किसान सभेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे … Read more