परिचारिका दिनानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परिचारिकांच्या कामाचे केले कौतुक

सांगली : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या कोरोना रुग्णालयास भेट व आढावा घेण्यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रुग्णालयातील परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत. यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं मोदी म्हणाले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे,२० लाख कोटी रुपयांचे … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१२- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१२ घटना घडल्या. त्यात ७५० व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ११ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ०४ हजार ४४९ गुन्हे नोंद … Read more

श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानकडे रवाना

कोल्हापूर, दि. 12 : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी नागौरकडे मार्गस्थ झाले. खासदार धैर्यशील माने यांनी गुलाब पुष्प देवून तर खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी जेवणाचे किट देवून पुन्हा जिल्ह्यामध्ये परत येण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही … Read more

राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे; सोमवारी विक्रमी ५८७ जणांना डिस्चार्ज

मुंबई, दि. १२: राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली असून आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचं काम होत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. काल सोमवारी ठाणे येथील २०९ … Read more

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 56 जणांची तपासणी

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून , या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच सुभेदार गल्ली परिसर प्रशासनाच्यावतीने लॉक करण्यात आला आहे. नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारी गल्ली येथील महिलेला सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाला होता. म्हणून ही … Read more

श्रमिकहो तुमच्यासाठी!

सातारा, दि. 11 ( जि.मा.का ) : सातारा जिल्ह्यात विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी काम करणारे श्रमिक लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्यासाठी आज सातारा रेल्वेस्थानकावरून स्पेशल श्रमिक रेल्वे मध्य प्रदेशातील रेवा कडे आज सोडण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी संजय आसवले, प्रांत मिनाज मुल्ला, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या सरपंचांनाच बेदम मारहाण !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमशेत गावात जनजागृती व त्या अनुषंगाने सांगितले म्हणून त्याचा राग मनात धरून सहा ते सात लोकांनी कुमशेतचे सरपंच सयाजी तुकाराम अस्वले यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अकोले पंचायत … Read more

भुकेल्या वाटसरूंना मिळाले मायेचे दोन घास

नाशिक, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा) : लॉकडाऊनमध्ये अडकलेले आणि आर्थिक टंचाईने ग्रासलेले हजारो जीव आता मुंबई, ठाण्यात राहण्यापेक्षा आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. घरात होतं नव्हतं तेव्हढं सोबत घेवून मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच निघालेल्या वाटसरूंना आयुष्याच्या या अनवट वाटेवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभ्या असलेल्या  सेवाभाव संस्थांच्या माणुसकीने धीर दिला आहे. जवळपास १०० हून अधिक सेवाभावी संस्था … Read more

हवामान विभागाकडून भारतीयांना खुशखबर !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- मान्सून येत्या शनिवार (दि.१६ मे)पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे भारतातही त्याचे आगमन लवकर होण्याचा अंदाज आहे, अशी खुशखबर हवामान विभागाने दिली आहे. तसेच, यंदाचा मान्सून हा सरासरी इतका राहणार आहे. अंदमानात मान्सून साधारणपणे २० मेच्या आसपास … Read more

मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू

मुंबई दि. 12 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना … Read more

अद्याप परतू न शकलेल्या कामगारांची निवारा केंद्रावर व्यवस्था

अमरावती : संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर व प्रवाश्यांसाठी रेल्वे, बस आदी वाहने सोडण्यात येत आहेत. तथापि, अद्यापही परतू न शकलेल्या कामगार बांधव व प्रवाश्यांनी संयम ठेवावा. त्यांचीही व्यवस्था होत आहे. अशा नागरिकांची निवास व भोजनाची व्यवस्था नसेल तर निवारा केंद्रावर ती सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना अर्थचक्राला गती … Read more

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

मुंबई, दि.१२: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांचा सत्कार

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी अथक आणि अहोरात्र सेवा बजावणार्‍या बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांचा आज जागतिक परिचारिका दिनी सत्कार करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना यामधील महत्वाचा दुवा असणार्‍या परिचारिकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील इव्हेंजलीन बूथ हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार … Read more

अहमदनगर शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, नगरसेवक म्हणाले ‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोडांचा पराभव !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी आज एका पत्रकाद्वारे  माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर जोरदार टीका करत राठोड यांच्या विधानसभेतील पराभवाचे कारणही या प्रत्रकातून सांगितले आहे. नगरसेवक नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे कि, आज भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे. … Read more

ऐकलत का…..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अहमदनगरमध्ये प्लॉट !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील. आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते. आज त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अहमदनगरमध्ये प्लॉट असल्याचे लिहून दिले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या … Read more

नाकाबंदी चौकीवर कार्यरत शिक्षकास ट्रकने चिरडले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरु असून राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. अद्याप मालवाहतूक सुरू असून या वाहनांची तपासणी करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकीवर पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भरधाव ट्रकनं चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकी तयार करण्यात आली आहे. … Read more