फेसबुक आता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही करणार मदत !

लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही मदत करणार आहे. फेसबुकने नुकतीच २० देशांमध्ये डेटिंग सेवा सुरु केली. मे महिन्यामध्ये पार पडलेल्या वार्षिक परिषदेमध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखविला होता. त्यानंतर दोन महिन्यांत फेसबुकची ही सेवा सुरू झाल्याची माहिती झकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार … Read more

तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यास अटक

पुणे : तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका भागविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मयूर दुर्योधन लोंढे (वय २१, रा. बरड, जि. सातारा) असे कोठडी दिलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय महिलेची सुटका केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे आण्णा दिलीप माने यांनी फिर्याद … Read more

ब्लड प्रेशर कमी करण्याचा उपाय नक्की वाचा

वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यात इतर कुठल्याही मार्गापेक्षा योग अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, असं नव्या संशोधनात आढळून आलं आहे.   ब्लडप्रेशर किती कमी करता येईल, याचा अभ्यास करण्याकरिता नेहमीच्या औषधांबरोबरच किंवा पर्याय म्हणून ध्यान, योग आणि गाइडेड इमेजरी या पद्धतींचा वापर करण्यात आला. यात योग सर्वांत प्रभावी असल्याचं लक्षात आलं. या तिन्ही पद्धतींनी मिळून सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी ११.५२ … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी निवडणुकीवर बहिष्कार !

शेवगाव :- तालुक्यातील आव्हाणे बु. ते रामनगर, या रस्त्याची अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी दिला आहे. आव्हाणेपासून जवळच असणाऱ्या रामनगर येथे एक हजार लोकवस्ती असून, दळणावळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक बंदी यासह अनेक धडाकेबाज निर्णय घेत केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. तसेच सामान्य नागरिकांना प्रत्येक स्तरावर बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली, अशा शब्दांत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारचा लेखाजोखा रविवारी जनतेपुढे मांडला आहे. मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण … Read more

संसर्गजन्य रोगावर हे आहेत सोपे उपचार…

आयुर्वेदात सहा ऋतूंचं वर्णन केलेलं आहे व या सहा ऋतूंमध्ये स्वास्थ्य टिकविण्यासाठी आहारविहार कसा असावा यासंदर्भात पण विस्तृत विवेचन केलेलं आहे. हे सहा ऋतू : वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म.उन्हाळ्यातील उष्णतेच्या त्रासामुळे प्रत्येक प्राणी वर्षाऋतूची आतुरतेनं वाट बघत असतो. वर्षाऋतू जरी मनोहारी वाटत असला, तरी स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून बरेचदा त्रासदायक ठरतो. वर्षाऋतूत प्रधानत: ज्वर … Read more

….तर देश मंदीच्या खाईत लोटला जाईल

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून मोदी सरकारने मौन बाळगले असून देशातील बिकट परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा प्रहार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून केला आहे. कंपन्या बंद पडत आहेत, व्यवहार ठप्प झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, १०० दिवसांत विकास न घडविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला राहुल गांधी … Read more

भाजपमध्ये कोणीही येऊ द्या , पण श्रीगोंद्याच्या उमेदवारीची शिफारस बबनराव पाचपुते यांचीच : खा. डॉ. सुजय विखे

श्रीगोंदा :- भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात मला चांगले माताधिक्य मिळवून दिले , त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार , असे  खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले. पंचायत समितीचे सभापती शहाजी हिरवे यांनी खेतमाळीसवाडी ( पारगाव ) येथे आयोजित केलेल्या माजी … Read more

दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे !

कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे. कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. महासंग्राम युवा मंच हे नामदेव … Read more

नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

दारु पिऊन रिक्षा चालवणे पडले महागात, तब्बल ४७ हजारांचा दंड !

भुवनेश्वर ;- नवीन मोटर वाहन कायद्यात बदल झाल्यानंतर दारु पिऊन रिक्षा चालवणे चालकास चांगलेच महागात पडले. भुवनेश्वरात पोलिसांनी रिक्षा चालकावर या नियमाचा भंग केल्याने ४७ हजार ५०० रुपये दंड लावला. याच प्रकारे हरियाणातील गुडगावात रिक्षा चालकावर ३२ हजार रुपये दंड लावला आहे. तर ट्रॅक्टर चालकावर ५९ हजाराचा दंड लावण्यात आला. पोलिसांनी त्याला सामान्य नियम तोडल्याबद्दल … Read more

फोन कसा पाहतात याचा सेक्स व उंचीवर परिणाम !

न्यूयाॅर्क :- लोक मोबाइल अथवा अन्य उपकरणे कसे हाताळतात किंवा पाहतात याचा सेक्स व उंचीवर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. अमेरिकेत फोन-टॅबलेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता डेस्कटॉप अथवा लॅपटॉप हाताळणाऱ्याच्या तुलनेत मान वळवणे व झुकवण्याची पद्धतीही वाढल्या आहेत, असे संशोधन जर्नल क्लिनिकल अनॉटॉमीमध्ये प्रकाशित झाले आहे. यानुसार अरकन्सास विद्यापीठातील संशोधनकर्त्यांनी … Read more

आ.भाऊसाहेब कांबळेंनी स्व.जंयतराव ससाणेंना फसविले !

श्रीरामपूर :- काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग दोन वेळा आमदार करण्यासाठी स्व. जंयतराव ससाणे यांनी प्रयत्न केले. पंरतु ससाणे यांनादेखील आ. कांबळे यांनी फसवले. स्व. ससाणे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज होते. त्यांनी लोकसभेला उघड आमदार कांबळेंविरुध्द काम केलं. लोकसभा निवडणूक आमदार कांबळे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची साथ घेत निवडणूक लढवली. पंरतु … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश … Read more

कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पाठवा…

जामखेड :- असंघटित कामगारांकरिता राज्यात काही ठिकाणी कामगार कल्याण मंडळाकडून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. ही व घरकुल योजना लवकरच नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याण मंत्री संजय भेगडे यांनी रविवारी केली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना २९ कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम चौंडीत झाला. … Read more

दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज !

श्रीगोंदे :- दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा दलित, आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष ही आणखी चिंताजनक बाब आहे. महिलांना नग्न करून मारहाण करणे, बलात्कार, लहान मुलांवर धारदार शस्त्रांनी वार, प्राणघातक हल्ला अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढवळगाव येथील … Read more

पंतप्रधान मोदी पाहणार गायीवरील शस्त्रक्रिया लाइव्ह !

नवी दिल्ली । मथुरेत ११ सप्टेंबरला आयोजित पशू-आरोग्य शिबिरात पाॅलिथिनी पोटात गेल्यामुळे आजारी असलेल्या गायीवर केली जाणारी शस्त्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह पाहणार आहेत. ही शस्त्रक्रिया १२ डॉक्टरांचे एक पथक करणार असल्याचे बरेली येथील पशू आरोग्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार सिंह यांनी सांगितले.

आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर :- कलात्मक व नाविन्यपूर्ण दागिने हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असून गेली पाच वर्ष परंपरा व आधुनिकता याचा मेळ घालणारे  केएनजे  ज्वेलर्सचे दागिन्याचे प्रदर्शन नगरकरासाठी पर्वणी असल्याचे मत सौ. धनश्री विखे यांनी व्यक्त केले.   केशवलाल नथूभाई ज्वेलर्स (केएनजे ) नाशिक तर्फे चोरडिया परिवार मस्तानी ग्रुप सहकार्याने आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.धनश्री विखे … Read more