नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.
आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?
यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.
- कालपर्यंतचे सोबती लंकेंविरोधात व विखेंच्या विजयासाठी अजित पवारांची सभा, लगेचच शरद पवार शड्डू ठोकणार, काका-पुतण्याची ‘खेळी’ नगरची गणिते बदलवणार?
- Mango Wrong Combination : आंब्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे सेवन, अन्यथा…
- Success Story: वयाच्या 62 व्या वर्षी ही महिला करते दररोज 1 हजार लिटर दुधाची विक्री व महिन्याला कमावते 4 लाख रुपये नफा! वाचा यशोगाथा
- Name Astrology : खूप अहंकारी असतात ‘या’ नावाची लोकं, सहजासहजी मानत नाहीत हार…
- Ahmednagar Politics : लग्नसराई संपली आता थेट २९ जूनलाच मुहूर्त ! नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासनालाही दिलासा, मतदानावरही परिणाम होणार