‘विझणार कधीच अंगार नाही’ म्हणत मुख्यमंत्र्यांचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये अन्यथा..; राऊत राज्यपालांवर आक्रमक

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या … Read more

“नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणारच”

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नवे सरकार काय घोषणा करणार किंवा शेतकऱ्यांशी संबंधित काय घोषणा असतील याबाबत सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार … Read more

…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो; जितेंद्र आव्हाडांनी केला भेटीचा खुलासा

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अद्यापही शिवसेनेचे आमदार, खासदार संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण … Read more

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण … Read more

‘त्यांच्या’ पत्राने १०० हत्ताचं बळ मिळालं; ठाकरे गटातील आमदाराचे वक्तव्य

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले. उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे, अशी भावना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतंर्गत आमदारांनी एकापाठोपाठ … Read more

“अशा आमदारांना राज्यपाल शपथ देणार असतील तर डॉ. आंबेडकरांची घटना उद्धवस्त झाली…”

मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात … Read more

भाजपसोबत युती करण्याची सेना खासदारांची मागणी; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. नैसर्गिक युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पक्ष प्रमुखांना बैठकीत केली. भाजपसोबत युतीमध्ये असताना आलेले … Read more

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या हालचाली वाढल्या

मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे. शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द … Read more

मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असे नाही; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राऊतांचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती निवडणूक, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गटांची एकमेकांवर टीका टिपण्णी अशा अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व विषयांवर भाष्य केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होते नाही, असे वक्तव्य संजय … Read more

“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने … Read more

आधी ठाकरेंकडे या म्हणत रडणारे संतोष बांगर आता उद्धव ठाकरेंनाच म्हणाले, ‘दृष्टीकोन बदला’

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले आहेत. बांगर यांच्या समर्थनार्थ मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त … Read more

शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत धनुष्यबाणाबाबत अनिल परबांचे मोठे वक्तव्य

मुंबई :  राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सध्या शिवसेनेत निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निवडणूक … Read more