विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू; या तालुक्यातील घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. यामध्ये आश्वी बुद्रुक येथील रमेश राधुजी गायकवाड (वय ६५) आणि पानोडी येथील ओंकार गणेश पवार (वय १५) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पानोडी शिवारातील आश्वी साकुर रस्त्यालगत असलेल्या पवार वस्तीलगत ओंकार हा मुलांसमवेत खेळत होता.

यावेळी जवळच असलेल्या विजेच्या खांबाला ओंकारचा हात लागल्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ओंकारला रुग्णालयात नेत असताना उपचाराआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तर दुसऱ्या घटनेत आश्वी बुद्रुक येथील रमेश गायकवाड यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोणी येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.