अहिल्यानगर दि. ३०- महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा
ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. ख़राब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधुन शिऊन बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, असेही कळविण्यात आले आहे.