Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे रिझर्व बँकने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती.

दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. याच बरोबर पहील्या व दुसऱ्या टप्प्यात १७२०० ठेवीदारांचे २९३.५७ कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात आले असून

१४४८५ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पुर्तता झालेली असून त्यांचे ६० कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहीती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील

नवीन आर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी आपली थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन

अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे. त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीक शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत,

असे आवाहन देखील श्री. गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी श्री. गायकवाड यांनी सांगितले.