मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …

कर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले. कर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती … Read more

बापूंना जाऊन एक वर्ष झाले, तरी त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत…

श्रीगोंदे ;- बापूंनी आयुष्यभर पुण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर आणि कामांवर प्रेम करणारा समाज आज येथे उपस्थित आहे. बापूंचे कार्य आणि नाव सदैव तेवत राहील असे काम करूया, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटील बोलत होते. बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना ‘नागवडे’चे … Read more

पिचड यांंच्या विरोधात माकप लढणार : डॉ. अजित नवले

अकोले :- पराभवाची भीती आणि राजकीय लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेही पिचडांसोबत भाजपत गेले. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगावी संघटन असलेला माकप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक आहे. माकप संपूर्ण ताकदीने या विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेप करून राजकीय तत्त्वनिष्ठता आणि पावित्र्याची जपवणूक करण्यात आघाडीवर राहील, असे … Read more

नगर-पुणे महामार्गावर अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

पारनेर :- नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात झालेल्या अपघातात अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे सव्वाच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले आहेत. लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला. जखमींमध्ये किसन … Read more

‘बबनराव मी कायम रिचेबलच असतो’ हर्षवर्धन पाटील यांचे पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर

श्रीगोंदा : स्व.शिवाजीराव (बापू)नागवडे यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली.कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रपंच बापूंनी उभे केले. सहकारातही बापूंचे सिंहाच योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सहकारी साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संस्थापक श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांच्या प्रथम … Read more

सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे – ना.प्रा.राम शिंदे

जामखेड : मला अतिशय आनंद होतोय की, आपल्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा हेतूने आजचा दिवसाचे विशेष महत्व आहे. कारण मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध … Read more

रस्ता दुरुस्तीसाठी निवडणुकीवर बहिष्कार !

शेवगाव :- तालुक्यातील आव्हाणे बु. ते रामनगर, या रस्त्याची अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी दिला आहे. आव्हाणेपासून जवळच असणाऱ्या रामनगर येथे एक हजार लोकवस्ती असून, दळणावळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

भाजपमध्ये कोणीही येऊ द्या , पण श्रीगोंद्याच्या उमेदवारीची शिफारस बबनराव पाचपुते यांचीच : खा. डॉ. सुजय विखे

श्रीगोंदा :- भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात मला चांगले माताधिक्य मिळवून दिले , त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार , असे  खासदार डॉ. सुजय विखे यांनी ठासून सांगितले. पंचायत समितीचे सभापती शहाजी हिरवे यांनी खेतमाळीसवाडी ( पारगाव ) येथे आयोजित केलेल्या माजी … Read more

दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे !

कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे. कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. महासंग्राम युवा मंच हे नामदेव … Read more

नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

आ.भाऊसाहेब कांबळेंनी स्व.जंयतराव ससाणेंना फसविले !

श्रीरामपूर :- काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग दोन वेळा आमदार करण्यासाठी स्व. जंयतराव ससाणे यांनी प्रयत्न केले. पंरतु ससाणे यांनादेखील आ. कांबळे यांनी फसवले. स्व. ससाणे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज होते. त्यांनी लोकसभेला उघड आमदार कांबळेंविरुध्द काम केलं. लोकसभा निवडणूक आमदार कांबळे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची साथ घेत निवडणूक लढवली. पंरतु … Read more

आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश … Read more

कर्जत-जामखेड मतदारसंघात उभे राहणारे पुण्याचे पार्सल परत पाठवा…

जामखेड :- असंघटित कामगारांकरिता राज्यात काही ठिकाणी कामगार कल्याण मंडळाकडून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. ही व घरकुल योजना लवकरच नगर जिल्ह्यात सुरू करणार असल्याची घोषणा कामगार कल्याण मंत्री संजय भेगडे यांनी रविवारी केली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना २९ कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम चौंडीत झाला. … Read more

दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज !

श्रीगोंदे :- दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा दलित, आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष ही आणखी चिंताजनक बाब आहे. महिलांना नग्न करून मारहाण करणे, बलात्कार, लहान मुलांवर धारदार शस्त्रांनी वार, प्राणघातक हल्ला अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढवळगाव येथील … Read more

आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर :- कलात्मक व नाविन्यपूर्ण दागिने हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असून गेली पाच वर्ष परंपरा व आधुनिकता याचा मेळ घालणारे  केएनजे  ज्वेलर्सचे दागिन्याचे प्रदर्शन नगरकरासाठी पर्वणी असल्याचे मत सौ. धनश्री विखे यांनी व्यक्त केले.   केशवलाल नथूभाई ज्वेलर्स (केएनजे ) नाशिक तर्फे चोरडिया परिवार मस्तानी ग्रुप सहकार्याने आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.धनश्री विखे … Read more

प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना?

संगमनेर :- काँग्रेसला व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना? असा खोचक सवाल गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना केला. ‘वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना कामं करणारी … Read more