संग्राम जगताप नगरच्या विकासाचा चेहरा :खा. डॉ अमोल कोल्हे

नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले. नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप … Read more

माझ्या बोलण्याचा विपर्यास करून माझी बदनामी – डॉ. सुजय विखे

तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप … Read more

महायुतीचा धर्म पाळायलाच हवा : आ. कर्डिले

चिचोंडी पाटील : पाचपुते व माझे काही गैरसमज होते, पण आम्ही आता एकत्र आलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पाचपुते व विजय औटी यांचेच काम करावे अन्यथा माझ्या घराचे दरवाज़े कार्यकर्त्यांना कायमचे बंद होतील, अशी तंबी आमदार शिवाज़ीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. बुऱ्हाणनगर येथे नगर , पारनेर व श्रीगोंदा, नगर मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत … Read more

पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती, सन्मानाने पार्सल परत पाठवा: ना. शिंदे

कर्जत : पाहुण्यांचा सन्मान करण्याची आपली संस्कृती असून, बाहेरून आलेले पार्सल सन्मानाने परत पाठवा, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे नाव न घेता केले. कर्जत तालुक्यातील राशीन गटात ना. शिंदे यांनी विविध गावांना भेटी देत ग्रामस्थाशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते. वायसेवाडीत ना. शिंदेंसह भाजपा कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत … Read more

अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या: खा. सुजय विखे

करंजी : राहुरी तालुक्यातील नावारुपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या,ते काय मतदारसंघाचा विकास करणार? असा सवाल करून राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार शिवाज़ीराव कर्डिलेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. आ. शिवाज़ीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आयोज़ित सभेत खा. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील … Read more

नीलेश लंके यांचा शेतकऱ्यांशी संवाद

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराचा तालुक्यात विविध ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे. लंके यांच्या प्रचारार्थ आज पारनेर शहरातील आठवडे बाजारासाठी तालुक्यातील खेड्या -पाड्यांतील आलेले अनेक शेतकरी बांधव, ग्राहक व विक्रेते यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने … Read more

डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे !!!

नगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्वचर राजकीय पक्ष आणि नेते करताना दिसत आहेत . शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे . त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले. शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ … Read more

नगर जिल्ह्यावर राधाकृष्ण विखेंचे गारुड !

नगर जिल्ह्यात पूर्वीपासून विखे यांची यंत्रणा गावोगाव होती; परंतु ती स्वतःच्या गटापुरतं पाहत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील नेते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अडकले आहेत. स्वतःचा मतदारसंघ सोडून कुणालाही कुठं जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे; परंतु राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे मात्र शिर्डीत अडकून पडलेले नाहीत. त्यांना त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री असल्यानं त्यांनी … Read more

अहमदनगरची घराणेशाही संपवा

कर्जत – नगर जिल्ह्यात घराणेशाही, सत्ता आणि पैशाचे राजकारण सुरु असून ते संपवा. राजकारणात गुन्हेगारी फोफावत आहे, त्यांना राजाश्रय दिला जातोय, त्यामुळे एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या राज्याचा कायापालट करून दाखवितो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. कर्जत जामखेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड. जाधव, … Read more

जगताप-शेलार म्हणजे नटसम्राट व वगसम्राटाची जोडी : मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले. तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी … Read more

कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला !

जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत. चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले. तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा … Read more

मतदानानंतर रोहित पवार गायब होणार!

जामखेड: उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा, यामुळे दिवसेंदिवस मला जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे २१ तारखेनंतर रोहित पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी कली. तालुक्यातील नान्नज येथील उरे वस्ती येथे पालकमंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांशी … Read more

२५ वर्षे व्यापार, उद्योग बुडवला ते आता पोकळ गप्पा मारताहेत!

नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप … Read more

नगराध्यक्षांसह सात नगरसेवक भाजपत दाखल

श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राजेंद्र नागवडे भाजपवासी झाल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या राजकारणात झाला. काँग्रेस आघाडीच्या सात नगरसेवकांनी व नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी सर्व नगरसेवकांचे बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते यांनी स्वागत केले. सदाशिव पाचपुते म्हणाले, मागे काय … Read more

जनहिताच्या कामामुळेच जनतेने २५ वर्ष अनिल राठोड यांना आमदार केल !

अहमदनगर :-  विरोधक उमेदवार म्हणतात २५ वर्षाचा हिशोब द्या. पण हे त्यांना माहित नाही कि त्यांचे वडील ७ वर्ष नगरअध्यक्ष होते. दहा वर्ष विधानपरिषद आमदार. उमेदवार स्वता ४ वर्ष महापौर आणि पाच वर्ष आमदार होते मग २६ वर्ष त्यांनी नगरकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा.  राज्यात २० वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी यांनी नगरच्या … Read more

नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर!

संगमनेर :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेसच्या ‘बाजीप्रभू’वर तोफ डागत निवडणुकीत जान आणली, पण हे वातावरण कायम राखण्यात महायुती यशस्वी होताना दिसत नाही. महायुतीतील रुसवेफुगवे सुरुच असल्याने काही नेते प्रचारापासून चार हात लांब आहेत. दुसरीकडे संगमनेरची निवडणूक सोपी झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांपासून राज्यात सभा घेत आहेत. नेता बाहेर असल्याने किल्ला शाबूत ठेवण्याची … Read more

परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा

कोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more