अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

अहमदनगर : काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन … Read more

अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे यांच्या सह राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर: राष्ट्रवादीच्या दोन गटात नगर शहरातील नंदनवन लॉनसमोर झालेला राडा आणि त्यानंतर दोन्ही गटांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, प्रकरण आपसात तडजोड होऊन मिटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे,यांच्या सह राष्टवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more

भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणतात रोहित पवारांच्या कामाने मी प्रभावित झालो!

जामखेड :- पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद … Read more

कर्जत-जामखेड विधानसभेची निवडणूक विखे यांच्या अस्तित्वाची लढाई !

जामखेड :- जिल्ह्याच्या व कर्जत-जामखेड तालुक्यातील सुपुत्राची आपल्या विकास करण्यासाठी गरज आहे, बाहेरच्या उसण्याची उधारीची गरज नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी रोहित पवार यांच्याावर नाव न घेता केली.जामखेड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, … Read more

आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषदेत सामसूम

अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू … Read more

‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली … Read more

रस्ता ग्रामीण भागात महत्त्वाचा घटक : आ.जगताप

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील जनतेसाठी रस्ता हा महत्वाचा घटक आहे. रस्ता चांगला असेल तर आपला शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहचवणे त्यांना सहज शक्य होते. वेळेत माल पोहचविला तर बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे रस्ता हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. असे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. कोळगाव ते गुंडेगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात … Read more

पोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण

संगमनेर : शेतजमिनीच्या कारणावरून पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. म्हणून त्याचा राग अनावर झाल्यामुळे बारा जणांनी एकत्र येत पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकूण बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येथील घटना याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली … Read more

भाजप नगरसेवकाकडून युवकास लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर : मनोज दुल्लम याने युवकास विनाकारण लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना सावेडीतील कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुल्लमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सागर अरुण घोरपडे (वय २५, रा.लालटाकी, नगर) हा युवक जखमी झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेल येथे … Read more

निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत. हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस … Read more

समाजकारणालाच जास्त महत्त्व देतो : सुजित झावरे

पारनेर :- विकासनिधीच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करणे हेच आपले उद्दिष्ट असून राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व देत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील देवीभोयरे गावठाण ते तुकाईवाडी मगरदरा रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. या वेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात … Read more

निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते – खा.डॉ सुजय विखे

कर्जत :- भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद या वेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि, खासदार सुजय विखे यांनी मध्यस्थी करत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपण भाजपत काम करणार आहोत, असे महासंग्रामचे संस्थापक नामदेव राऊत यांनी सांगितले. महासंग्राम युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. विखे … Read more

राज्यात कर्जत- जामखेड मतदारसंघ आदर्श करू : ना. शिंदे

कर्जत : आगामी पाच वर्षांत मतदारसंघाचा असा विकास करून दाखविल की, संपूर्ण महाराष्ट्र येथील विकास पाहायला आला पाहिजे, आपण अगोदर करतो व नंतर सांगतो आणि काम करण्यावर जास्त भर देतो. मतदारसंघात जे होत नव्हते ते काम तुमच्या विश्वासामुळे करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. वालवड (ता. कर्जत) येथे संत सद्गुरू श्री … Read more

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई … Read more

आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात ?

राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती … Read more

सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची … Read more

आ. कर्डिलेंनी विधानसभेत पाच वर्षांत फक्त दोन वेळा तोंड उघडले !

राहुरी, नगर व पाथर्डी ही तालुक्याची गावे मतदारसंघात असताना दहा वर्षांत एकही नवीन पाणी योजना कार्यान्वित करता आली नाही. पालिकेच्या सुधारित पाणी योजनेत व मंजुरीत ज्यांचे काडीचेही योगदान नाही, असे नि्क्रिरय आमदार शिवाजी कर्डिले शहरात फलकबाजी करून स्वत:चा सत्कार घडवून आणत आहेत. योजनेचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद व केविलवाणा आटापिटा करीत आहेत. योजनेविषयी समोरासमोर चर्चा करण्याची … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज !

अहमदनगर : विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अवघ्या एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात जिल्हा निवडणूकशाखेमार्फत निवडणूक आयोगाच्या आदेश बरहुकूम सतर्कतेने सज्जता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २८ … Read more