अक्षय्य तृतीलाला घरातील ‘या’ दिशेला फक्त एक दिवा लावा, आयुष्यभर पैशाची कमी भासणार नाही!

30 एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, योग्य दिशेने दिवा लावल्यास देवी लक्ष्मीचा कृपावर्षाव होतो. तसेच, दान केल्याने आर्थिक समृद्धी, सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा घरात स्थायिक होते.

Published on -

Akshaya Tritiya 2025 | अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. यावर्षी ही तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार असून, या दिवशी केलेल्या धार्मिक कृती आणि दान याचे फल कधीही क्षीण होत नाही, म्हणूनच या दिवसाला ‘अक्षय फलाचा दिवस’ असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट पूजा व दिवा लावण्याचे नियम पाळल्यास घरात नक्कीच सौख्य, समाधान आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते.

धार्मिक महत्त्व

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाणारी अक्षय्य तृतीया ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा असली तरी त्यापेक्षा अधिक महत्त्व आहे पूजाविधी आणि दानधर्माचे. असे मानले जाते की या दिवशी जो कोणी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि गरजू लोकांना अन्न व वस्त्र दान करतो, त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही.

दिवा लावण्याचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णू व लक्ष्मी यांचे हे स्थान असल्याने इथे दिवा लावल्याने दोघांचे आशीर्वाद एकत्र मिळतात. तसेच, घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडे दिवा लावल्यास धनसंपत्तीचे देवता कुबेर प्रसन्न होतात आणि आर्थिक प्रगती होते. याशिवाय, घराच्या छतावर किंवा मंदिरात दिवा लावणे देखील शुभ फळ देते.

दानाचे महत्त्व

या दिवशी केलेले दान ‘अक्षय’ फलदायी मानले जाते. विशेषतः गरजूंना दूध, दही, तांदूळ, खीर, साखर, पांढरे कपडे, शंख इत्यादी वस्तू दान केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, या दिवशी केलेल्या दानामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक शांती लाभते. फक्त धनलाभच नव्हे, तर दानामुळे पुण्यसंचयही वाढतो, जो पुढील जीवनातही लाभदायक ठरतो.

शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अक्षय्य तृतीया 29 एप्रिल संध्याकाळी 5:29 पासून सुरू होऊन 30 एप्रिल दुपारी 2:12 पर्यंत राहणार आहे. मात्र उदयतिथी प्रमाणे 30 एप्रिललाच अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल. त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा करणे अत्यंत शुभ ठरेल.

अशा प्रकारे अक्षय्य तृतीया हा केवळ खरेदीचा दिवस नसून, पुण्यसंचय आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा लाभ घेण्याचा एक विलक्षण क्षण असतो. यंदा या दिवशी तुपाचा दिवा लावून आणि गरजूंना मदत करून तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!