IMD Rainfall Alert: पुढील 5 दिवस ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पाऊस लावणार हजेरी ; मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rainfall Alert: देशात मागच्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होताना दिसत आहे .

यातच आता पुढील पाच देशातील काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतात पुन्हा एकदा पावसाळा सुरू होणार आहे. 6 आणि 7 मे रोजी उत्तर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर 7 मे ते 9 मे या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

IMD नुसार अंदमान आणि निकोबारमध्ये 7 आणि 8 मे रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय 7 मे रोजी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छिमारांना 7 मे ते 9 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम भारताबद्दल बोलायचे झाले तर 5 मे नंतर पश्चिम हिमालयीन भागात पावसाची नवीन फेरी येईल. याशिवाय 6 आणि 7 मे रोजी वायव्य भारतातील मैदानी भागात पाऊस, गडगडाट होऊ शकतो. पंजाब आणि हरियाणामध्ये 7 मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण भारतात पाच दिवस पाऊस

दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर पुढील पाच दिवस पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वारे इत्यादींचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकलमध्ये 4 मे रोजी मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय 7 आणि 8 मे रोजी दक्षिण आतील कर्नाटकात मुसळधार पाऊस पडू शकतो.

ईशान्य भारतातील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशात 4 आणि 5 मे रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. आसाम आणि मेघालयमध्ये 4 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने गेल्या 24 तासांच्या हवामानाबाबत सांगितले की बुधवारी देशातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सरासरीपेक्षा तीन ते सहा अंश सेल्सिअस कमी राहिले.

त्याच वेळी 7 मेच्या आसपास ओडिशाच्या किनारी भागात कमाल तापमानात वाढ होईल. 8 मे पर्यंत तापमान सामान्यपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढू शकते. त्याच वेळी पुढील पाच दिवस देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता नाही.

हे पण वाचा :-  Married Life Relationship Tips: वैवाहिक जीवनात होत असेल ‘या’ गोष्टी तर समजून घ्या आता ..