जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखताला पसंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural News : सलग रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपिकतेसाठी आता शेणखताला पसंती दिली आहे.

त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात शेणखताला अधिक मागणी आहे.

शेणखत हे जनावरांच्या शेणापासून बनवलेले एक नैसर्गिक खत आहे. शेणखत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांची वाढ सुधारण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. त्यामुळे शेणखताची मागणी वाढण्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

शेतीसाठी शेणखताचे अनेक लाभ आहे. जमिनीची सुपीकता वाढवते. शेणखत जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्ये पुरवते. जमिनीची धूप कमी होते आणि पाणी धारणा क्षमता वाढते. पिकांची वाढ सुधारते. शेणखत जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते.

हे सूक्ष्मजीव पिकांना आवश्यक पोषकद्रव्ये मुक्त करण्यास मदत करतात. तसेच पाण्याचा वापर कमी करते. शेणखत जमिनीला थंड ठेवण्यास मदत करते. बाष्पीभवन कमी होते. पिकांना कमी पाण्याची आवश्यकता भासते. रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी करते.

शेणखत जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवते. हे जीवाणू रोग आणि किडींना नियंत्रित करण्यास सहाय्यकारी ठरते. सूक्ष्मजीवांची वाढ होते. शेणखत हे सूक्ष्मजीव जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. पकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. शेणखत पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

शेणखत शेतात खत म्हणून वापरले जाते. हे खत सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त आहे. शेणखत बागेत खत म्हणून वापरले जाते. हे खत फूलझाडे, भाजीपाला आणि फळझाडांसाठी उपयुक्त आहे. शेणखताचा वापर जैवइंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. यासाठी शेणखतापासून गोबर गॅस बनवला जातो.

शेणखत इंधन म्हणूनही वापरले जाते. शेणखतापासून गोवऱ्या बनवल्या जातात आणि गोवऱ्या चुलीत इंधन म्हणून वापरल्या जातात. शेणखत बनवण्यासाठी जनावरांचे शेण एका ठिकाणी साठवून त्याला कुजवून घेतले जाते. शेण कुजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर कैला जातो.