Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या नेहमी लक्षात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांच्यामध्ये एक विलक्षण प्रतिभा होती. ते एक कुशल अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी, राजकारणी याशिवाय ते एक योग्य गुरु होते. तसेच त्यांना सर्व विषयांचे सखोल ज्ञानही होते. ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी आपले ज्ञान आणि अनुभवांना त्यांच्या रचनांमध्ये संग्रहित केले आहे. जर तुम्ही आचार्य चाणक्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आयुष्यात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती.

आचार्य चाणक्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये बऱ्याच साध्या परंतु अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी जीवनात उतरवल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. जाणून घेऊयात अशाच काही गोष्टी…

चाणक्य नीतीच्या महत्त्वाच्या गोष्टी

नाट्यंतम् सरलैरभव्यं गत्वा पश्य वनस्थलिम् ।
छिद्यन्ते सरलस्त्र कुब्जस्तिष्ठंति पादप: ॥

आचार्य चाणक्य असे म्हणतात की, व्यक्तीचे व्यवहारात खूप भोळे किंवा साधे मन असू नये. कारण अशा व्यक्तीचे नेहमीच खूप मोठे नुकसान होते. हे सतत लक्षात ठेवा की जंगलात प्रथम सरळ झाडे तोडण्यात येतात तर क्रॉस किंवा तिरपे झाडे वाचवण्यात येतात.

कामधेनुगुण विद्या ह्यकले फलदायी ।
प्रवासे मातृसृष्टी विद्या गुप्तम् धनम् स्मृतम् ॥

याचा अर्थ असा की विद्या ही कामधेनू गाईसारखी आहे जी माणसाला प्रत्येक परिस्थितीत आणि ऋतूत अमृत प्रदान करत असते. ती व्यक्तीचे आईप्रमाणे संरक्षण करत असल्याने ज्ञानाला गुप्त संपत्ती म्हणतात.

यो ध्रुवनि परित्यज्य अध्रुवां परिशेवते ।
ध्रुवनि तस्य नाश्यन्ति चध्रुवां नास्तमेव हि ॥

म्हणजेच निर्णय घेत असताना योग्य-अयोग्य ओळखायला विसरू नका. जो व्यक्ती अनिश्चिततेवर पैज लावत असतो तसे चुकीचे असते, तो सर्वकाही गमावतो. त्यामुळे माणसाने विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये.

आयुः कर्म च विण्ण च विद्या नियंत्रणमेव च ।
पंचैतानि हि श्रीज्यन्ते गर्भस्थस्यैव देहीन: ॥

चाणक्य यांच्या मतानुसार, एखाद्या व्यक्तीला किती वय, कर्म, धन आणि ज्ञान मिळेल, या सर्व गोष्टी त्याच्या आईच्या पोटात येण्यापूर्वीच ठरत असतात. त्यांची इच्छा असूनही त्यांना कोणीच बदलू शकत नाही.