बदनामी चे षडयंत्र फसले,शेतकरी निघाले ईस्त्राईलला.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : उद्योगभारती ही राज्यात शेतकरी बांधवां ना ईस्त्राईल ला अभ्यास दौरा आयोजन करणारी संस्था म्हणून नावा रुपाला आली. कोरोना काळात या संस्थेच्या वतीने करण्यात येणार्या दौऱ्यां वर परिणाम झाला.

मात्र कोरोना नंतर पुन्हा ईस्त्राईल करता शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला, तरीही परदेश प्रवास म्हटलं की आणि ईस्त्राईल सारखा देश म्हटलं की तांत्रिक अडचणी या असणार च, २०२२ मधे पन्नास शेतकरी यांना ईस्त्राईल ने अचानक व्हिसा नाकारला.

आणि उद्योग भारती चा हा दौरा व्यवसायिक विरोधकां कडून संशयाच्या भोवर्‍यात अडकला.ज्यांच्या मुळे व्हिसा रद्द करण्यात आला त्याच बहाद्दरांनी उद्योगभारती ची जाहीर आणि येथेच्छ बदनामी करण्याची सुरुवात केली. काहींनी ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा च्या समन्वयक म्हणून प्रसिद्ध आणि अनुभवी असलेल्या महेश कडूस पाटील यांच्या सोशल मीडिया वरून बदनामी चा पेड विडाच उचलला.

आता या रद्द झालेल्या ग्रुप मधील काही जणांना एक वर्षा नंतर व्हिसा मिळाला असून लवकरच ते ईस्त्राईल प्रवास पुर्ण करतील अशी माहिती उद्योगभारती बाणेर पुणे कार्यालयातून दिली गेली आहे. व्हिसा मिळण्यात पुर्वी अडचणी येत नव्हत्या,

परंतु काही मंडळी नी जाणीवपूर्वक ग्रुप मधे प्रवेश करून आम्हाला अडचणीत आणण्याचा व जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला, ज्यांचे व्हिसा २०२२ मधे रद्द करण्यात आले होते त्यातील काही मंडळी ना २०२३ मधे व्हिसा मुंबई येथून आम्ही प्रयत्न पुर्वक मिळवून दिला आहे.

अजुन काही मंडळी प्रतीक्षेत असली तरी व्हिसा मिळवून प्रवास करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचा व्हिसा मुंबईतून आम्ही केला आहे त्यांचे ईस्त्राईल प्रवासाचे स्वप्न आता जुलै २०२३ मधे पुर्ण होईल.

तसेच व्हिसा होणे न होणे हे आमच्या हातात नसले तरी आम्ही आमच्या शेतकरी सभासदांना व्हिसा मिळवण्यासाठीच संपूर्ण प्रयत्न असतात ते दौर्यात आले तर आमचाही फायदाच होतो त्यामुळे अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊ नये असे प्रतिपादन ईस्त्राईल दौरा समन्वयक महेश कडूस पाटील यांनी केले आहे.

जुलै २०२३ अखेर सुमारे तीस शेतकरी ईस्त्राईल करता निघणार असून, व्यवसायिक बदनामी नंतर उद्योगभारती ने हे मिळवलेले मोठे यश असून, महेश कडूस पाटील हे ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा विषयावरील अनुभवी व तज्ञ असून त्यांनी आणि संस्थेने बदनामी करणार्यांची तोंडे आपल्या कामातून बंद केली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवां नी दिल्या आहेत.

बदनामी केलेल्या पेड पत्रकार व विरोधकां वर पुणे पिंपरी चिंचवड येथे ३ कोटी चा नुकसान भरपाई चा व अब्रू नुकसानी व आर्थिक नुकसानी चा दावा दाखल करण्यात आला आहे. एकूणच उद्योगभारती आणि ईस्त्राईल चे काम कृषि क्षेत्रात नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरू झाले आहे.