Election Result 2022 Live : पाच राज्यातील निवडणुका, वाचा बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections) आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत.

यामध्ये उत्तर प्रदेश (UP), गोवा (Goa), पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत.

बहुतांश ठिकाणी भाजपने (Bjp) आघाडी घेतली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या जागांचे गणित वेगळे आहे. तसेच प्रत्येक राज्यातील बहुमताचा आकडाही वेगवेगळा आहे. कोणत्या राज्यात किती जागांसाठी बहुमत लागते सविस्तर समजून घ्या.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा आहेत. या राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान झाले. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणत्याही सरकार २०२ जागांची गरज आहे.

पंजाब

पंजाब हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात सध्या काँग्रेसची (Congress) सत्ता आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे गेली वर्षभर हे राज्य चर्चेत राहिलं. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा असून बहुमतासाठी अवघ्या ५९ जागांची आवश्यकता आहे.

उत्तराखंड

पंजाबप्रमाणेच उत्तराखंडमध्येही बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. या राज्यात भाजप सत्ताधारी पक्ष आहे. पण भाजपला गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यावरून पक्षातील अंतर्गत कलह आणि राज्यातील अस्थिरता दिसून येते. ७० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी अवघ्या ३६ जागांची आवश्यकता आहे.

गोवा

गोवा हे सर्वात छोटं राज्य आहे. पण या राज्याने नेहमीच देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोव्यातील निवडणूक पूर्वीचं आणि निवडणुकीनंतरच समीकरण नेहमीच वेगळं असतं. त्रिशंकू विधानसभेत तर गोव्याची सर्वच समीकरणे बदलून जात असल्याचं पाहायला मिळतं. गोवा विधानसभेत ४० जागा आहे आणि बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे.

मणिपूर

गोव्यानंतर मणिपूरही छोटं राज्य आहे. मणिपूर विधानसभेत एकूण ६० जागा आहेत. पण बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एनपीएफ, एनपीपी आणि एलजीपीशी युती करून सरकार स्थापन केलं होतं.