Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Jeevan Akshay Policy : भारीच की! फक्त एकदाच गुंतवा ‘या’ योजनेत पैसे, तुम्हाला महिन्याला मिळेल हजारो रुपयांची पेन्शन

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी भारतीय जीवन विमा कंपनी ही आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. असाच एक प्लॅन या कंपनीने आणला आहे.

Jeevan Akshay Policy : भारतीय जीवन विमा कंपनी म्हणजेच एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. जी सतत आपल्या ग्राहकांसाठी विम्याचे वेगवेगळे प्लॅन ऑफर करत असते. सर्व गटातील लोकांसाठी कंपनीची पॉलिसी उपलब्ध आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशीच एलआयसीची एक महत्त्वपूर्ण पॉलिसी आहे ती म्हणजे जीवन अक्षय या पॉलिसी. यामध्ये ग्राहकाला फक्त एकदाच एक विशिष्ट रकमेची गुंतवणूक करावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पॉलिसीमध्ये तुम्हाला महिन्याला हजारो रुपयांची पेन्शन मिळेल.

काय आहे प्लॅन

LIC ने या योजनेला जीवन अक्षय पॉलिसी असे नाव दिले असून जी तुम्हाला केवळ एकदा गुंतवणूक करून चांगला परतावा देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत लाभार्थीचा मृत्यू होईपर्यंत परतावा येत राहतो. कारण या योजनेत प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून ठराविक रक्कम दिली जाते.

जर तुम्ही जीवन अक्षय योजनेत गुंतवणूक केली की, तुम्हाला ठराविक कालावधीनंतर मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन स्वरूपात मिळू लागते. खरं तर LIC तुमच्या पैशातून व्याजही घेईल ज्यामुळे तुम्हाला पेन्शन देण्यात येईल.

कोणाला करता येतो अर्ज?

समजा तुम्ही 30 ते 85 वयोगटातील व्यक्ती असल्यास तुम्ही ही पॉलिसी खरेदी करू शकता. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

हे लक्षात घ्या की या योजनेतील एकल प्रीमियम म्हणून किमान गुंतवणूक रक्कम रु 1 लाख इतकी आहे. म्हणजेच तुम्हाला किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संयुक्त गुंतवणूकदार या पॉलिसीमध्येही गुंतवणूक करू शकतात.

तसेच प्रत्येक गुंतवणूकदाराला वैयक्तिकरित्या किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला दिली जाईल.

मिळतो वार्षिकी पर्याय

या पॉलिसीमध्ये 10 पेक्षा जास्त उपलब्ध वार्षिकी पर्याय प्रदान करण्यात येत आहेत. पॉलिसी धारकाला या पॉलिसीच्या सुरूवातीस गॅरंटीड अॅन्युइटी दर मिळतो. तसेच तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबून गुंतवणुकीवरील परतावा थोडा बदलतो.

किती मिळते पेन्शन?

समजा एका गुंतवणूकदाराने जीवन अक्षय पॉलिसीमध्ये एकाच वेळी 9,16,200 रुपये जमा केले तर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून परतावा किंवा पेन्शन म्हणून दरमहा 6,859 रुपये मिळतात. तसेच, त्याला वार्षिक 86,265 रुपये किंवा सहामाही आधारावर 42,008 रुपये किंवा तिमाही आधारावर 20,745 रुपये मिळू शकतील.