केवळ दैवबलवत्तर म्हणून ‘ते’ कुटुंबीय बालंबाल बचावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन येथील एका शेतकर्‍याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेमध्ये दैवबलवत्तर कुटुंबीय बालंबाल बचावले आहे. सोमनाथ बाबुराव गाडेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी येथे सोमनाथ गाडेकर हे कुटुंब वास्तव्यास आहे.

आणि रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक घराची भिंत कोसळली. या वेळी गाडेकर यांची पत्नी व मुले घाबरून घराच्या बाहेर पळाले.

केवळ दैवबलवत्तर असल्याने गाडेकर कुटुंब हे बालंबाल बचावले आहे. जर कधी रात्रीची भिंत कोसळली असती तर मोठी घटना घडली असती.

घराची भिंत कोसळल्याची माहिती समजताच बोरबनचे सरपंच संदेश गाडेकर यांनी घटनेची माहिती कामगार तलाठी दादा शेख यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आहे.