Ration Card : अन्न पुरवठा विभागाच्या आवाहनंतर ‘या’ राज्यातील तब्ब्ल 91 हजारांहून अधिक लोकांनी रेशनकार्ड केले सरेंडर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card : अन्न पुरवठा विभागाच्या (Food Supply Department) आवाहनानंतर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) 91 हजारांहून अधिक लोकांनी रेशनकार्ड सरेंडर केले आहे. त्यासाठी अपात्र शिधापत्रिकाधारकांना 30 जूनपर्यंत शिधापत्रिका जमा करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती.

पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) नवीन शिधापत्रिका (Ration card) बनविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी दिली आहे.

91 हजार लोकांनी आपले कार्ड सरेंडर केले

सरकारच्या (Uttarakhand Government) आवाहनानंतर एकूण ९१ हजार शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका सरेंडर केली. अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, राज्यभरात आतापर्यंत ९१ हजार शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका सरेंडर केली आहेत.

सरकारने अपात्र लोकांना रेशनकार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. यानंतर, शेवटच्या तारखेला ३१ मे रोजी मोठ्या संख्येने शिधापत्रिकाधारक रेशनकार्ड जमा करण्यासाठी डीएसओ कार्यालयात (DSO office) पोहोचले, त्यानंतर सरकारने त्याची तारीख वाढवली.

मंत्र्यांनी माहिती दिली

अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी रेशनकार्ड सरेंडर करणाऱ्यांचे आभार मानत राज्यात त्यांच्या स्तरावर शिधापत्रिका बनवल्या जातील असे सांगितले. राज्यात 22 लाखांहून अधिक शिधापत्रिका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा नवीन शिधापत्रिका बनविण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

लवकरच पात्र लोकांची शिधापत्रिका बनवली जाणार आहेत. अपात्र लोकांच्या शिधापत्रिका जमा करण्यात आल्या आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका सरेंडर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन स्तरावरून शिधापत्रिका बनवण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले.