‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’मध्ये सामील होण्यासाठी ही माहिती वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने अलीकडेच ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, दुसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे गरिबांना फायदा होईल. ‘स्वच्छ इंधन, उत्तम जीवन’ या घोषवाक्यासह केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ ही समाजकल्याण योजना सुरू केली.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या या योजनेचे विशेष लक्ष महिलांवर आहे. नोंदणी करून, तुम्ही हे मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन घेऊ शकता. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’मध्ये सामील होण्यासाठी काही निकष निश्चित केले गेले आहेत, जे पूर्ण केल्यावरच त्याचा लाभार्थी बनू शकतो.

लोकांच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होतो की या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत? त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की यासाठी कोण पात्र आहेत.

खाली आहेत पात्रता निकष :-

– अर्जदार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची महिला असणे आवश्यक आहे

– अर्जदार बीपीएल कार्डधारक ग्रामीण रहिवासी असणे आवश्यक आहे

– अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.

– अर्जदार कुटुंबाकडे आधीपासूनच एलपीजी कनेक्शन असू नये.

आवश्यक कागदपत्र :-

– बीपीएल रेशन कार्ड

पंचायत प्रधान / नगरपालिका अध्यक्ष द्वारा अधिकृत BPL प्रमाणपत्र

फोटो ओळखपत्र (आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र)

पासपोर्ट आकाराचा एक अलीकडील फोटो

मूलभूत तपशील जसे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन धन/बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.

अर्ज कसा करावा:-

सर्वप्रथम pmuy.gov.in वर उज्ज्वला योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या

आता ‘नवीन उज्ज्वला 2.0 कनेक्शनसाठी अर्ज करा’ वर जा

आपल्याला पृष्ठाच्या तळाशी तीन पर्याय (इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) मिळतील म्हणजेच गॅस कंपन्यांचा पर्याय

तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा

आता विनंती केलेली माहिती भरून सबमिट करा

दस्तऐवज पडताळणीनंतर, एलपीजी गॅस कनेक्शन तुमच्या नावाने दिले जाईल.