त्या तरुणाची आत्महत्या ! आत्महत्या का केली, याचे कारण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणाऱ्या अक्षय अनिल पावसे या २५ वर्षीय तरुणाने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली.

या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. मात्र त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली.

हा तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा आहे. सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता. हा तरुण मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱया तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमधील अशोकनगर परिसरात घडली आहे.

दरम्यान, या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अक्षय अनिल पावसे (वय 25, मूळ रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे.

अशोकनगर परिसरात एका एक्सप्रेस रेल्वेखाली तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता, त्याची ओळख पटली. अक्षय तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून, सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता.

तो मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. मात्र, अक्षयने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.