UPSC Interview Questions : कल्पना चावला यांनी कोणत्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : देशात तरुणवर्ग सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरपड करत आहे. अशा वेळी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर भर दिला जातो.

जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : तिरंग्यामध्ये अशोक चक्राचा समावेश कोणत्या दिवशी करण्यात आला आहे?
उत्तर : २२ जुलै १९४७

प्रश्न : पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती अभयारण्याचा समावेश आहे?
उत्तर : पाच

प्रश्न : नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
उत्तर : रत्नागिरी

प्रश्न : कल्पना चावला यांनी कोणत्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते?
उत्तर : १९९१ साली

प्रश्न : महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेला मुलगा कोणत्या समाजाचा होता?
उत्तर : ब्राह्मण समाज

प्रश्न : सुपारी संशोधन केंद्र असलेले श्रीवर्धन हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : रायगड