किराणा आणायला गेला अन् सून घेऊन आला

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील तरुण किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि लग्नच करुन आला. हे प्रकरण येथेच थांबे नाही तर हे पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. त्यानंतर घरात बराच वाद झाला. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत न्यावं लागलं. अखेर या सर्व प्रकरणावर संमतीने तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले. या तरुणाचे गुड्डू आणि त्याच्या बायकोचे नाव सविता … Read more

700 वर्षांपूर्वीही केलं जात होतं क्वारंटाइन ; चीनवरूनच आला होता ‘हा’ आजार

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाइन केलं जातं आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) सल्ला देत आहे. मात्र 700 वर्षांपूर्वीही लोकांना क्वारंटाइन केलं जात होत. सोशल डिस्टन्स पाळलं जात होतं. 1348 च्या दरम्यान प्लेग हा रोग आला होता. त्याला काळा आजारही म्हटलं जातं होत. त्यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केलं जाऊ … Read more

अर्थसंकटाबाबत राहुल गांधींनी घेतली रघुराम राजन यांची मुलाखत काय म्हणाले रघुराम राजन

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊन हाच पर्यंत त्याला आहे. त्याशिवाय हा रोग आटोक्यात येणार नाही. यामुळे छोट्यांपासून मोठे कारखाने बंद आहेत. व्यवसाय उद्योग धंदे बंद पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्व काम बंद असल्याने भविष्यात अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता विविध तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सध्या जगासमोर अर्थव्यवस्थेला पुन्हा सुधारण्याचं मोठं आव्हान आहे. या … Read more

राज्यातील ‘या’ शहरात कोरोनाचा हाहाकार ! कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला

मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार उडविला आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २७६ कोरोनाबाधित असून एकट्या मालेगावात २५३ कोरोनाग्रस्त आहे. येथे ८०० पोलीस आणि एसआरपीएफ तुकडया तैनात करण्यात आल्या असूनही कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. … Read more

चुकीला माफी नाही ! आमदाराच्या ड्रायव्हर कडून आकारला ‘इतका’ दंड

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- चुकीला माफी नाही याचा प्रत्यय श्रीरामपूर शहरात आमदारांच्या ड्रायव्हरला झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली. … Read more

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यास जाळून मारण्याचा प्रयत्न

संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावत असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यास मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सायंकाळी माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ हा प्रकार घडला. मारहाण केल्यानंतर या आरोपीने थेट गाडीतील पेट्रोलची बाटली काढून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याची फिर्याद … Read more

परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना आणण्यासाठी आराखडा तयार करा

नागपूर, दिनांक 30:-‘लॉकडाऊन’मुळे राज्यात व राज्याबाहेर अडकून पडलेले विद्यार्थी, मजूर व नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून अशा व्यक्तींची माहिती गोळा करून निधीसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातून आज त्यांनी नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी … Read more

महाविद्यालये सुरु होणार सप्टेंबरमध्ये असे असेल नियोजन

देशभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे देशातील शैक्षणिक संस्थांचे काम बंद पडले आहे. साधारण जूनच्या सुमारास सुरू होणाऱ्या विद्यापीठांतील शैक्षणिक सत्राचा प्रारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. आत्ताच्या सत्रातील परीक्षा शक्य झाल्यास येत्या जुलैमध्ये होतील, अशी चिन्हे आहेत. देशातील विद्यापीठांत शैक्षणिक सत्र कधी सुरू करायचे, परीक्षा कधी घ्यायच्या आदी मुद्द्यांबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विशेष समितीची स्थापना केली … Read more

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा

मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

मुंबई, दि. ३० : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि … Read more

स्नेहाची शिदोरी थेट गरजूंच्या दारी…

एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची, आपल्याकडे असलेल्या एक भाकरीतील अर्धी भाकरी समोरच्या उपाशी माणसाला देण्याची आपली भारतीय संस्कृती. आपण ज्या सामाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो ही आपली शिकवण. या भावनेतूनच जळगाव येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात गरीब … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरे यांनी लावला थेट मोदींना फोन ; काय झालं संभाषण

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाने दोन वेळेस राज्यपालांची भेट घेतली आहे. या प्रस्तावावर विचार करतो, अशी सूचक प्रतिक्रिया राज्यपालांनी दिल्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. आता या पेचप्रसंगावर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे … Read more

असेल स्वच्छ चूल तर कोरोनामुक्त बनेल घरकुल !

  ‘स्वच्छ इंधन, सशक्त जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील 2 लाख 24 हजार  महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या डोळ्यांवर व शरीरावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम टाळण्यासाठी, ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल काल निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित ०७ व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने … Read more

कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या … Read more

हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठं ठोकता ? कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी … Read more

महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात ३३३ गुन्हे दाखल

मुंबई, दि. ३० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली ? वाचा सविस्तर

सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुरु आहे. मंत्रिमंडळाने याबाबत राज्यपालांची भेट घेतली आहे. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. यापाठीमागे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी या हालचाली आहेत, असा थेट आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटल … Read more