लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा आहे आजवरचा सर्वात सोपा उपाय

हल्लीच झालेल्या एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, काही वेळ नुसते उभे राहूनही आपण लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांची जोखीम कमी करू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उभे राहून आपण दर सहा तास बसून वा झोपून राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सुमारे ४५ कॅलरी घटवू शकतो.  जीवनशैलीत किरकोळ बदल करून व्यक्ती गतीहीन जीवनशैलीच्या दुष्परिणामांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. … Read more

प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवतोय…

युद्घ-संघर्षापेक्षाही आत्महत्येमुळे मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जगात प्रत्येक वर्षी जवळपास ८ लाख लोक मृत्यूला कवटाळत आहेत. अर्थात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवीत असल्याची चिंताजनक माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने सोमवारी दिली आहे. प्रामुख्याने गळफास, विषप्राशन आणि गोळी झाडून लोक स्वत:चे जीवन संपवीत असल्याचे चित्र आहे. अशा … Read more

हे छोटेस रोपटे आहे विषापेक्षाही जास्त खतरनाक ! 

मानव सतत झाडे-रोपट्यांचा आपल्या सुखसुविधांसाठी वापर करत आला आहे. कागदनिर्मितीपासून फर्निचरपर्यंत सगळ्यांसाठी तो झाडांवर अवलंबून आहे. मात्र नेहमीच असे होत नाही. कधीकधी झाडेझुडपेच मानवाला नुकसान पोहोचवितात.  ‘होगहीड’ नावाचे गाजरगवत प्रजातीचे रोपटे असेच खतरनाक आहे. ते फारसे मोठे नसते, पण कोब्रा सापाएवढे घातक असते. होगवीड अतिशय विषारी रोपटे समजले जाते. ‘किलर ट्री’ नावानेही ते प्रसिद्ध आहे. … Read more

हे नक्की वाचा …अशा वेळी ग्रीन टी चे सेवन केले तरी काहीच फायदा नसतो…

ग्रीन टी एक उत्तम प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट समजले जाते. मात्र हल्लीच झालेल्या अध्ययनातून त्याच्याबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. समजा आयर्न म्हणजे लोहयुक्त भोजनानंतर ग्रीन टीचे सेवन केले तर त्याचा प्रभाव कमी होतो, असे त्यात म्हटले आहे.  पालकासारख्या कगाही हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असते. अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात एका … Read more

काम करत नसल्याने घरातून बाहेर काढले,अखेर रागातून त्याने केला आणि वहिनी, पुतण्याचा खून !

मुंबई : कामोठे सेक्टर ३४ येथे राहणाऱ्या विवाहितेची आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाची मोठ्या दिराने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरेश चव्हाण असे दिराचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  चव्हाण हा काहीच काम करत नसल्याने त्याला कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. या रागातून … Read more

काँग्रेसमधील गटबाजी अखेर चव्हाट्यावर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अंतर्गत गट-तटांच्या राजकारणाला कंटाळून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या स्टार उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  उर्मिलांच्या राजीनाम्यावरून मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात आता जुंपली आहे. देवरा यांनी ट्विट करून उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत, असे म्हणत निरुपमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा … Read more

आता याला काय म्हणाव ? लुंगीवर गाडी चालवल्यास चारपट दंड !

लखनौ : लखनौमध्ये जर तुम्ही बरमुडा, शॉर्ट्स अथवा लुंगी घालून गाडी चालवली तर तुम्हाला चारपट दंड भरावा लागेल. यासंदर्भात वाहतूक पोलीस अधीक्षकांनी नवीन फर्मान काढले आहे.  याअंतर्गत मोठे आणि जड वाहन चालवताना जर वाहतूक ॲक्टच्या नियमानुसार कपडे घातले नाहीत, तर नवीन दराने दंड वसूल केला जाणार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक म्हणाले की, गाडी चालवणाऱ्यांसाठी विशेष … Read more

दंड वाचवण्यासाठी दुचाकी चालकाने हेल्मेटसोबत केले असे काही….

वडोदरा : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जात आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  यात एक ५० वर्षीय दुचाकी चालक हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवून प्रवास करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.. दुचाकी चालकाचे रामपाल शाह असे नाव असून, ते … Read more

विम्याचे पैसे मिळावे म्हणून त्याने दिली आपल्याच हत्येची सुपारी !

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील मंगरोप ठाण्याच्या हद्दीत आर्थिक अडचणींमुळे त्रासलेल्या एका फायनान्सरने आपलीच हत्या करण्यासाठी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे.  विम्याचे ५० लाख रुपये आपल्या कुटुंबाला मिळावेत, यासाठी फायनान्सरने हे पाऊल उचलल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. बलबीर खारोलने अनेक जणांना २० लाख रुपये उसने दिले होते. उसने दिलेली ही … Read more

प्लास्टिक बाटल्या द्या मोबाईल रिचार्ज मिळवा !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यानुसार जर प्रवाशांनी टाकाऊ बाटली स्थानकावरील क्रशिंग मशिनमध्ये टाकली तर त्यांना मोफत मोबाईल रिचार्ज करून दिला जाणार आहे. परंतु हा रिचार्ज नेमका किती रुपयांचा असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. … Read more

मोबाइल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

नागपूर बाजार आणि गर्दीच्या ठिकाणांवर लोकांचे मोबाइल हँडसेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर पोलिसांची छडा लावला असून झारखंडमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळीतील सदस्यांना त्यांच्या कामगिरीनुसार चक्क पगार दिला जायचा, अशी माहिती नागपूर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. नागपुरात मागील काही महिन्यांत सार्वजनिक ठिकाणांवर लोकांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या.  या चोऱ्यांचा छडा लावताना पोलिसांनी … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, … Read more

दोन-तीन दिवसांत होणार विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह तीन राज्यांत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाची आज गुरुवारी यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये वर्षाच्या अखेरला निवडणूक होणार आहे. . प्रथम महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये, तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक … Read more

शिंदे साहेब तुम्हीच मन मोठं करा आणि कर्जतच्या भूमीपुत्राला संधी द्या…

कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना सोडून भाजपतील मोठा गट राऊत यांच्या गळाला लागल्याने मतदारसंघातील राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे. उमेदवारीसाठी प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत हे दोघे दावेदार झाल्याने पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पक्षाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र … Read more

आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…

श्रीरामपुर:-भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात श्रीरामपुरात फलक लावण्यात आले असून ‘आमचं ठरलंय… सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसविणाऱ्याला पाडायचं…’ असा मजकूर असलेल्या या फलकांची जोरदार चर्चा जिल्हाभरात आहे. यामुळे श्रीरामपुरातील कांबळे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर आता युतीच्या नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार व नुकत्याच … Read more

आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे…यशवंतराव गडाख यांचे कार्यकर्त्याना भावनिक आवाहन

नेवासा :- ‘मी चाळीस-पन्नास वर्षे राजकीय संघर्षात घालवली. संस्था वाढवल्या जपल्या मात्र आता तरी कार्यकर्त्यांनी वरून कीर्तन आतून तमाशा करू नये.  माझे भाषण हे शेवटचे आहे का मला माहिती नाही. मला काही मागायचे नाही तुम्हाला पण आयुष्याचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे,’ असे भावनिक आवाहन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. गडाख अलीकडेच आजारपणातून … Read more

माजीमंत्री पाचपुतेंच्या कारखान्या विरोधात शेतकर्‍यांचे उपोषण

श्रीगोंदा – तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे न दिल्याच्या निषेधार्थ आलेश्वर (ता.परांडा) येथील शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी हे साखर आयुक्तालय,पुणे येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्तांना शेतकर्‍यांनी दिले आहे. परांडा तालुक्यातील आलेश्वर, बंगाळवाडी, गोसावीवाडी डोंजा … Read more

माजी आ. शंकरराव गडाख ‘या’ पक्षाकडून लढणार विधानसभा !

नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते. यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्‍यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही … Read more