हुकुमशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ नाही लागत …! आमदार राम शिंदे यांची आ. रोहीत पवार यांच्यावर टीका

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता.

मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं.आयुष्यात दु:ख आल्याशिवाय सु:खाची किंमत कळत नाही म्हणतात, त्याप्रमाणे अडीच वर्षे हुकुमशाही, दडपशाही राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर कर्जत-जामखेडकरांच्या लक्षात आलं आ.राम शिंदे आमदार म्हणुन योग्यं आहेत.

नेता मोठ्या घरातला असुन उपयोगाचा नसतो, आपला नेता आपल्यातलाचं असावा लागतो कारण अडचणीच्या काळात शेवटी आपला तो आपलाच असतो. असे प्रतिपादन आ.राम शिंदे यांनी केले.

कर्जत जामखेडचे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेडचे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले मी मागच्या दाराने आमदार झालो, पण मी सरकार घेऊन आलो आहे. त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व विकास करण्यासाठी तुमच्या आशिर्वादाने तालुकासाठी पुन्हा काही तरी चांगले मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe